शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निश्चितीवरून सरकारकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:03 IST

कोल्हापूर : दुष्काळ निश्चितीचे निकष बदलून सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान ...

कोल्हापूर : दुष्काळ निश्चितीचे निकष बदलून सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. घटलेले उत्पन्न हा दुष्काळाचा निकष ठरवून तालुक्याऐवजी गाव हा परिमाण मानून गावातच पीक कापणी प्रयोग घेऊन दुष्काळ निश्चिती करावी, अशी मागणीही डॉ. नवले यांनी केली.दुष्काळाचे जटिल निकष, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव या मागणीसाठी किसान पूर्ण ताकदीनिशी जिल्हा, राज्य व केंद्रीय अशा तीन पातळीवर आंदोलन करणार आहे, अशी घोषणाही डॉ. नवले यांनी केली.अखिल भारतीय किसान सभेतर्फे कोल्हापुरात दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेनंतर डॉ. नवले यांनी पत्रकार बैठक घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने येथून पुढे बाजार समित्यांना किसान सभा टार्गेट करणार आहे. बाजार समितीत शिरून शेतमाल विक्री केंद्रे सुरू करण्यास भाग पाडले जाणार आहे. जर यात हयगय झाली तर सहकार व पणन कायद्यानुसार कारवाईसाठी आग्रहही धरला जाणार आहे, असे डॉ. नवले यांनी सांगितले.मुख्यमंत्री नापासमोठा गाजावाजा आणि प्रसिद्धी करत मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजना राबवली पण दुष्काळात साठे कोरडे पडल्याने मुख्यमंत्री त्यात नापास झाल्याचेच दिसत आहे.‘जलयुक्त शिवार’च्या जाहिराती करणाºया मुख्यमंत्र्यांनी अक्षम्य पाप केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.शेतकरी संघटनांमध्ये मुख्यमंत्री भांडणे लावताहेत३५00 रुपये उसदर मिळावा यासाठी सरकारचा प्रमुख या नात्याने धोरणे घ्यायची सोडून स्वत: मुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हे हास्यास्पद व पदाला न शोभणारे आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.असे असणार आंदोलन२ नोव्हेंबर : जिल्हा पातळीवर किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने : १५ नोव्हेंबर : मुंबईत राज्यव्यापी शेतकरी परिषद, भाजपवगळता सर्व पक्षांना निमंत्रण : २८,२९, ३० नोव्हेंबर : देशभरातील १८० संघटनांचा दिल्लीत लाँगमार्च, संसदेला घेराओ