शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

दुष्काळ निश्चितीवरून सरकारकडून दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 01:03 IST

कोल्हापूर : दुष्काळ निश्चितीचे निकष बदलून सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान ...

कोल्हापूर : दुष्काळ निश्चितीचे निकष बदलून सरकार जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. घटलेले उत्पन्न हा दुष्काळाचा निकष ठरवून तालुक्याऐवजी गाव हा परिमाण मानून गावातच पीक कापणी प्रयोग घेऊन दुष्काळ निश्चिती करावी, अशी मागणीही डॉ. नवले यांनी केली.दुष्काळाचे जटिल निकष, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव या मागणीसाठी किसान पूर्ण ताकदीनिशी जिल्हा, राज्य व केंद्रीय अशा तीन पातळीवर आंदोलन करणार आहे, अशी घोषणाही डॉ. नवले यांनी केली.अखिल भारतीय किसान सभेतर्फे कोल्हापुरात दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेनंतर डॉ. नवले यांनी पत्रकार बैठक घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने येथून पुढे बाजार समित्यांना किसान सभा टार्गेट करणार आहे. बाजार समितीत शिरून शेतमाल विक्री केंद्रे सुरू करण्यास भाग पाडले जाणार आहे. जर यात हयगय झाली तर सहकार व पणन कायद्यानुसार कारवाईसाठी आग्रहही धरला जाणार आहे, असे डॉ. नवले यांनी सांगितले.मुख्यमंत्री नापासमोठा गाजावाजा आणि प्रसिद्धी करत मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार योजना राबवली पण दुष्काळात साठे कोरडे पडल्याने मुख्यमंत्री त्यात नापास झाल्याचेच दिसत आहे.‘जलयुक्त शिवार’च्या जाहिराती करणाºया मुख्यमंत्र्यांनी अक्षम्य पाप केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.शेतकरी संघटनांमध्ये मुख्यमंत्री भांडणे लावताहेत३५00 रुपये उसदर मिळावा यासाठी सरकारचा प्रमुख या नात्याने धोरणे घ्यायची सोडून स्वत: मुख्यमंत्र्यांनी ऊस परिषद घेणे हे हास्यास्पद व पदाला न शोभणारे आहे. परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकºयांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५00 रुपये ऊसदर देण्याची हमी द्यावी, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.असे असणार आंदोलन२ नोव्हेंबर : जिल्हा पातळीवर किसान सभेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने : १५ नोव्हेंबर : मुंबईत राज्यव्यापी शेतकरी परिषद, भाजपवगळता सर्व पक्षांना निमंत्रण : २८,२९, ३० नोव्हेंबर : देशभरातील १८० संघटनांचा दिल्लीत लाँगमार्च, संसदेला घेराओ