शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

प्रशासनाचा घोळ, प्रवाशांचे हाल

By admin | Updated: July 24, 2014 00:08 IST

एस. टी., महापालिका, आरटीओचे दुर्लक्ष : ऐन पावसाळ्यात प्रवाशांना ताप

कोल्हापूर : संततधार पाऊस... नाकाला रुमाल लावायला भाग पाडणारी दुर्गंधी... अस्वच्छतेचे पसरलेले साम्राज्य... अशा परिस्थितीमध्ये शेकडो प्रवाशांना दररोज एस. टी. बसची वाट पाहावी लागते. हे चित्र कुठल्या ग्रामीण भागातील नसून, शहरातील गजबजलेल्या टाउन हॉल बसथांब्यानजीकचे. निवारा नसलेला हा बसथांबा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सी.पी.आर. चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने ‘आरटीओ’ने टाउन हॉल येथील एस.टी. बसथांबा हलविण्याची सूचना दिली होती. त्यानुसार येथील थांबा काही दिवसांपूर्वी हलविण्यात आला. तो शंभर फुटांवर नेण्यात आला. याठिकाणी पिक-अड शेड बांधण्यासाठी एस. टी.ने महापालिकेकडे परवानगी मागितली; परंतु महापालिकेने याला नकार दिल्याने या ठिकाणी पिक-अप शेड उभे राहिलेच नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पन्हाळा, जोतिबा, मलकापूर, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पावसाचा मारा सोसत व शेजारील स्वच्छतागृहातील घाणेरडा वास सहन करीत एस.टी.साठी तिष्ठत थांबावे लागत आहे. यामध्ये नोकरदार, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी व शेतकरी अशा प्रवाशांचा समावेश आहे. अलीकडे दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने छत्र्या घेऊन निवाराविना प्रवाशांना उभे राहावे लागत आहे.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पावसापासून संरक्षण करणाऱ्या छत्र्याही उडून जाव्यात, अशी स्थिती आहे. ‘आरटीओ,’ ‘महापालिका’ व ‘एस.टी.’ यांच्या त्रांगड्यात दररोज शेकडो प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी जागेची व्यवस्था करा, अन्यथा पूर्ववत पिक-अप शेड थांबा हलवू, असा इशारा ‘एस.टी.’ प्रशासनाने ‘आरटीओ’ कार्यालयाला पत्राद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)-निवारा नसलेला एस.टी बसथांबा-टाउन हॉल येथील एस.टी. बस थांबा हलविल्याने प्रवाशांचे हाल-आरटीओ, महापालिका, एस.टी. यांच्या त्रांगड्याने सोसावा लागतोय त्रास