शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

मंत्र्यांची समिती अमान्य

By admin | Updated: May 20, 2015 00:23 IST

गांधीनगर वाद : पुतळा संवर्धन समितीची बैठकीत स्थापना

कोल्हापूर : गांधीनगर (ता़ करवीर) येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रकरणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नेमलेली समिती आंबेडकरी संघटनांना मान्य नाही़ आंबेडकरांच्या पुतळ्याचे संरक्षण हा एका गटाचा प्रश्न नसून संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे़ त्यामुळे ‘आरपीआय’च्या एका स्वार्थी गटास हाताशी धरून पालकमंत्र्यांनी घोषित केलेली समिती ‘बालक समिती’ आहे, अशी टीका आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या बैठकीत मंगळवारी करण्यात आली. यावेळी बैठकीत झालेल्या चर्चेनंतर पुतळा संरक्षणासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा संवर्धन समितीची स्थापनाही करण्यात आली़ गांधीनगरातील शिरू चौकातील डॉ़ आंबेडकरांच्या पुतळ्यावरील वादावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी (दि. १८) पाचसदस्यीय समितीची स्थापना केली; पण या समितीमध्ये आंबेडकरी चळवळीतील प्रा़ शहाजी कांबळे आणि उत्तम कांबळे हे दोनच प्रतिनिधी आहेत़ इतर आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश नाही़ या पार्श्वभूमीवर येथील शाहू स्मारक भवनामध्ये मंगळवारी ही बैठक झाली़ यावेळी विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांनी सिंधी समाज, पालकमंत्री आणि आठवले गटाचा तीव्र निषेध केला़ अध्यक्षस्थानी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर होते़ आरपीआय (गवई गट) गटाचे अध्यक्ष प्रा़ विश्वासराव देशमुख म्हणाले, पालकमंत्र्यांनी समिती स्थापन करताना सर्व आंबेडकरी-पक्ष संघटनांना विश्वासात घ्यायला हवे होते़; पण भाजप-शिवसेनेशी लागेबांधे असलेल्या ‘आरपीआय’च्या गटाच्या दोन नेत्यांना समितीमध्ये घेण्यात आले आहे़ दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक म्हणाले, पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणाऱ्या कोल्हापुरात घटनेच्या शिल्पकाराच्या पुतळ्याला होणारा विरोध दुर्दैवी आहे; पण हा पुतळा आहे तिथेच सन्मानाने बसविण्यास आंबेडकरी कार्यकर्ते कटिबद्ध आहेत़दलितमित्र व्यंकाप्पा भोसले म्हणाले, आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी बसविण्यासाठी आता शासनानेच योग्य तो हस्तक्षेप करावा़ जातीय मानसिकता आजही लोकांच्या मनात घर करून आहे, हे सिंधी समाजाच्या विरोधातून दिसून येते़ यावेळी ‘पीआरपी’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नंदकुमार गोंधळी, बहुजन परिवर्तन पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष बाजीराव नाईक, लोकजनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, ब्लॅक पँथरचे संस्थापक सुभाष देसाई, अस्मिता दिघे, सोमनाथ घोडेराव, प्रशांत वाघमारे, प्रा़ जी़ बी़ अंबपकर, आदी विविध संघटनेचे नेते, कार्यकर्त्यांची भाषणे झाली़ (प्रतिनिधी)गांधीनगर येथे डॉ. आंबेडकर यांचा पुतळा बसविण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. शासनस्तरावरील उर्वरित मान्यतेच्या कामासाठी आंबेडकरवादी जनतेने संयमाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन रिपाइंचे (आठवले गट) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.पालकमंत्र्यांची समिती बरखास्त करावीपालकमंत्र्यांनी डॉ़ आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेली समिती बरखास्त करावी, असे निवेदन डॉ़ आंबेडकर पुतळा संवर्धन समितीतर्फे जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी यांना दिले़ आंबेडकरांचा पुतळा आहे त्याच ठिकाणी सन्मानाने बसवावा. पुतळा हलविल्यास संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही या निवेदनात दिला आहे़