शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
2
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
3
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
4
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
5
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
6
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
8
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
9
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
10
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
11
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
12
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
13
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
14
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
15
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
16
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
17
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
18
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
19
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
20
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

मंत्रीच रस्त्यावर उतरणे म्हणजे बनवेगिरीचा कळस: रघुनाथदादा पाटील

By admin | Updated: May 6, 2017 19:32 IST

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारे मातीत जातील

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल करीत ‘स्वाभिमानी’चा मोर्चा आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सहभाग म्हणजे बनवेगिरीचा कळस झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्यांना शेतकरीच मातीत घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

विजय जाधव यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचा प्रारंभ शनिवारी कोल्हापुरातून झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारसह ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेवर आसूड ओढले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सर्वजण कर्जमाफीची मागणी करतात. या पक्षांचे सभागृहात स्पष्ट बहुमत असताना या मंडळींची सभागृहाबाहेर ‘नौटंकी’ सुरू आहे. सरकारविरोधातील मोर्चात राज्यमंत्री उतरतात आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे म्हणजे देवेंद्रजी, अजब तुमचे सरकार आणि धन्य धन्य ते मुख्यमंत्री, असेच म्हणावे लागेल. सिंचनाअभावी विदर्भ, मराठवाड्यातच आत्महत्या होतात, असा निष्कर्ष सरकार काढते; पण राजर्षी शाहू महाराजांच्या दुरदृष्टीमुळे पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेल्या कोल्हापुरातील शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? ही सरकारला चपराक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट झाले तर आत्महत्या होणार, असे सरकारचे म्हणणे आहे; पण देशाची ४० कोटी लोकसंख्या असताना गहू, मिलो, तांदूळ आयात करून पोट भरावे लागत होते. त्यावेळी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता १३० कोटी लोकसंख्या होऊन पाचपट उत्पादन वाढले तरीही आत्महत्या होतात. याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

नेते सत्तेत, पण समाज तिथेच

मराठा आरक्षणासाठी पुढे असणारे संभाजीराजे यांना भाजपने खासदार केले. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या महादेव जानकर यांना मंत्री, तर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री केल्याने या घटकांचे सगळे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती; पण या नेत्यांना पदे मिळाली पण समाज आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तिथेच असल्याची टीका पाटील यांनी केली. तगादा लावाल तर हिसका दाखवू कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बॅँकांची यापूर्वी फार वाईट अवस्था केली. बॅँकेच्या तगाद्यामुळेच कोडोली येथील शितापे यांनी आत्महत्या केली. यापुढे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला, तर बॅँकांना हिसका दाखवू, असा इशारा पाटील यांनी दिला.