शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

मंत्रीच रस्त्यावर उतरणे म्हणजे बनवेगिरीचा कळस: रघुनाथदादा पाटील

By admin | Updated: May 6, 2017 19:32 IST

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारे मातीत जातील

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल करीत ‘स्वाभिमानी’चा मोर्चा आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सहभाग म्हणजे बनवेगिरीचा कळस झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्यांना शेतकरीच मातीत घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

विजय जाधव यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचा प्रारंभ शनिवारी कोल्हापुरातून झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारसह ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेवर आसूड ओढले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सर्वजण कर्जमाफीची मागणी करतात. या पक्षांचे सभागृहात स्पष्ट बहुमत असताना या मंडळींची सभागृहाबाहेर ‘नौटंकी’ सुरू आहे. सरकारविरोधातील मोर्चात राज्यमंत्री उतरतात आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे म्हणजे देवेंद्रजी, अजब तुमचे सरकार आणि धन्य धन्य ते मुख्यमंत्री, असेच म्हणावे लागेल. सिंचनाअभावी विदर्भ, मराठवाड्यातच आत्महत्या होतात, असा निष्कर्ष सरकार काढते; पण राजर्षी शाहू महाराजांच्या दुरदृष्टीमुळे पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेल्या कोल्हापुरातील शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? ही सरकारला चपराक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट झाले तर आत्महत्या होणार, असे सरकारचे म्हणणे आहे; पण देशाची ४० कोटी लोकसंख्या असताना गहू, मिलो, तांदूळ आयात करून पोट भरावे लागत होते. त्यावेळी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता १३० कोटी लोकसंख्या होऊन पाचपट उत्पादन वाढले तरीही आत्महत्या होतात. याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

नेते सत्तेत, पण समाज तिथेच

मराठा आरक्षणासाठी पुढे असणारे संभाजीराजे यांना भाजपने खासदार केले. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या महादेव जानकर यांना मंत्री, तर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री केल्याने या घटकांचे सगळे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती; पण या नेत्यांना पदे मिळाली पण समाज आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तिथेच असल्याची टीका पाटील यांनी केली. तगादा लावाल तर हिसका दाखवू कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बॅँकांची यापूर्वी फार वाईट अवस्था केली. बॅँकेच्या तगाद्यामुळेच कोडोली येथील शितापे यांनी आत्महत्या केली. यापुढे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला, तर बॅँकांना हिसका दाखवू, असा इशारा पाटील यांनी दिला.