शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मंत्रीच रस्त्यावर उतरणे म्हणजे बनवेगिरीचा कळस: रघुनाथदादा पाटील

By admin | Updated: May 6, 2017 19:32 IST

शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणारे मातीत जातील

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर , दि. 0६ : सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल करीत ‘स्वाभिमानी’चा मोर्चा आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सहभाग म्हणजे बनवेगिरीचा कळस झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्यांना शेतकरीच मातीत घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.

विजय जाधव यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचा प्रारंभ शनिवारी कोल्हापुरातून झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारसह ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेवर आसूड ओढले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सर्वजण कर्जमाफीची मागणी करतात. या पक्षांचे सभागृहात स्पष्ट बहुमत असताना या मंडळींची सभागृहाबाहेर ‘नौटंकी’ सुरू आहे. सरकारविरोधातील मोर्चात राज्यमंत्री उतरतात आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे म्हणजे देवेंद्रजी, अजब तुमचे सरकार आणि धन्य धन्य ते मुख्यमंत्री, असेच म्हणावे लागेल. सिंचनाअभावी विदर्भ, मराठवाड्यातच आत्महत्या होतात, असा निष्कर्ष सरकार काढते; पण राजर्षी शाहू महाराजांच्या दुरदृष्टीमुळे पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेल्या कोल्हापुरातील शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? ही सरकारला चपराक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट झाले तर आत्महत्या होणार, असे सरकारचे म्हणणे आहे; पण देशाची ४० कोटी लोकसंख्या असताना गहू, मिलो, तांदूळ आयात करून पोट भरावे लागत होते. त्यावेळी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता १३० कोटी लोकसंख्या होऊन पाचपट उत्पादन वाढले तरीही आत्महत्या होतात. याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

नेते सत्तेत, पण समाज तिथेच

मराठा आरक्षणासाठी पुढे असणारे संभाजीराजे यांना भाजपने खासदार केले. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या महादेव जानकर यांना मंत्री, तर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री केल्याने या घटकांचे सगळे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती; पण या नेत्यांना पदे मिळाली पण समाज आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तिथेच असल्याची टीका पाटील यांनी केली. तगादा लावाल तर हिसका दाखवू कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बॅँकांची यापूर्वी फार वाईट अवस्था केली. बॅँकेच्या तगाद्यामुळेच कोडोली येथील शितापे यांनी आत्महत्या केली. यापुढे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला, तर बॅँकांना हिसका दाखवू, असा इशारा पाटील यांनी दिला.