शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अशोक चव्हाण वेड पांघरून पेडगावला चाललेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण यांना एक तर कायदा कळत नाही किंवा ते मराठा समाजाची दिशाभूल ...

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण यांना एक तर कायदा कळत नाही किंवा ते मराठा समाजाची दिशाभूल करताना वेड पांघरून पेडगावला चाललेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.

मंत्री चव्हाण यांनी मराठा आरक्षण रद्दबाबतच्या पत्रकार परिषदेत १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर आरक्षणाबाबतचे अधिकार राज्यांना नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याचा पाटील यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले,१०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला आहेत, हे उच्च न्यायालयानेही मान्य केले. सर्वोच्च न्यायालयात अटर्नी जनरल यांनीही हेच मत मांडले आहे. परंतु चव्हाण यांना हे मान्य नाही. ते सभागृहाची दिशाभूल केल्याचे सांगत आहेत. २८८ विधानसभेचे आणि ७८ विधानपरिषदेचे आमदार इतके लहान नाहीत, की त्यांना कळत नाही.

महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू नीटपणे मांडता आलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार होते, तेव्हा मराठा आरक्षण करून का घेतले नाही, असे चव्हाण विचारतात. तर त्यांना माझा सवाल आहे की, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळातही दोन्हीकडे काँग्रेसचेच सरकार होते. तेव्हा आरक्षण का नाही दिले? अजूनही राज्याच्या मागास आयोगाने पुन्हा एकदा आक्षेपांचा अभ्यास करून, मराठा समाज कसा मागास आहे हे पटवून द्यावे. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. तेथून तो राष्ट्रपतींकडे जाईल. त्यांनी होकार दिल्यानंतर हा कायदा राज्यालाच करावा लागणार आहे. चेंडू राज्याच्याच कोर्टात आहे. परंतु राज्यात अजून मागासवर्ग आयोगच का नेमला नाही, याचे उत्तर चव्हाण यांनी द्‌यावे.

चौकट

मराठा समाज पुढारलेला आहे, हे सहा आयोगांनी सांगितले

याआधीच्या सहा आयोगांनी मराठा समाज हा पुढारलेला आहे, हे लेखी स्पष्ट केले आहे. परंतु तेव्हाच्या सरकारांनी हे अहवाल का नाही फेटाळले, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांचा आयोग नेमून, मराठा हे मागास आहेत याची मांडणी केली. मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, ही भूमिका असलेल्या चव्हाण यांनी समाजाची दिशाभूल थांबवावी.