शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अशोक चव्हाण वेड पांघरून पेडगावला चाललेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण यांना एक तर कायदा कळत नाही किंवा ते मराठा समाजाची दिशाभूल ...

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते व मंत्री अशोक चव्हाण यांना एक तर कायदा कळत नाही किंवा ते मराठा समाजाची दिशाभूल करताना वेड पांघरून पेडगावला चाललेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.

मंत्री चव्हाण यांनी मराठा आरक्षण रद्दबाबतच्या पत्रकार परिषदेत १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर आरक्षणाबाबतचे अधिकार राज्यांना नाहीत, असे वक्तव्य केले होते. त्याचा पाटील यांनी समाचार घेतला. चंद्रकांत पाटील म्हणाले,१०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला आहेत, हे उच्च न्यायालयानेही मान्य केले. सर्वोच्च न्यायालयात अटर्नी जनरल यांनीही हेच मत मांडले आहे. परंतु चव्हाण यांना हे मान्य नाही. ते सभागृहाची दिशाभूल केल्याचे सांगत आहेत. २८८ विधानसभेचे आणि ७८ विधानपरिषदेचे आमदार इतके लहान नाहीत, की त्यांना कळत नाही.

महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू नीटपणे मांडता आलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार होते, तेव्हा मराठा आरक्षण करून का घेतले नाही, असे चव्हाण विचारतात. तर त्यांना माझा सवाल आहे की, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या काळातही दोन्हीकडे काँग्रेसचेच सरकार होते. तेव्हा आरक्षण का नाही दिले? अजूनही राज्याच्या मागास आयोगाने पुन्हा एकदा आक्षेपांचा अभ्यास करून, मराठा समाज कसा मागास आहे हे पटवून द्यावे. तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा. तेथून तो राष्ट्रपतींकडे जाईल. त्यांनी होकार दिल्यानंतर हा कायदा राज्यालाच करावा लागणार आहे. चेंडू राज्याच्याच कोर्टात आहे. परंतु राज्यात अजून मागासवर्ग आयोगच का नेमला नाही, याचे उत्तर चव्हाण यांनी द्‌यावे.

चौकट

मराठा समाज पुढारलेला आहे, हे सहा आयोगांनी सांगितले

याआधीच्या सहा आयोगांनी मराठा समाज हा पुढारलेला आहे, हे लेखी स्पष्ट केले आहे. परंतु तेव्हाच्या सरकारांनी हे अहवाल का नाही फेटाळले, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांचा आयोग नेमून, मराठा हे मागास आहेत याची मांडणी केली. मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही, ही भूमिका असलेल्या चव्हाण यांनी समाजाची दिशाभूल थांबवावी.