शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शिंगणापूर बंधाऱ्यातून लाखो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोपार्डे: शहराला पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ...

कोपार्डे: शहराला पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. शिंगणापूर बंधाऱ्याची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणातून सातत्याने पाणी सोडावे लागत असल्याने पाटबंधारे विभागावर पाणी नियोजनाचा ताण पडत आहे.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाणी दिले जात आहे. या धरणातील ७६.६५ द.ल.घ.मी पाणीसाठा कोल्हापूरसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून भोगावती नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी शिंंगणापूरजवळील महापालिकेच्या मालकीच्या बंधाऱ्यात अडवून शहराला पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येते. मात्र, शिंगणापूर बंधाऱ्याचे उजवीकडून ४, ५ व ८ नंबरचे लाकडी बरगे व स्टील गंजल्याने यातून पर सेकंद २.५० क्यूसेस पाणी वाहून जात आहे. पंपिंग स्टेशनला लागणारी पाण्याची पातळी राखण्यासाठी सातत्याने भोगावती नदीत धरणातून पाणी सोडावे लागत आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होत असल्याने पावसाळा लांबल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यावरही गंडांतर येणार आहे. यासाठी महानगरपालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून गळती काढणे गरजेचे आहे.

चौकट : पाणबुड्या आणून पाटबंधारे विभागाने चार पाच व आठ नंबरच्या गळ्यातील गळती काढण्याचा प्रयत्न केला होता. पण येथे पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने ते शक्य झाले नाही. यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शिरोळपर्यंत पाणी पोहोचत आहे. सडलेले बरगे बदलण्यासाठी महापालिकेने टेंडरही दिले आहे. पण ती बदलण्यासाठी नियोजन नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोट : गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेबरोबर या बंधाऱ्यातील गळती काढण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. या ठिकाणी पाण्याचा मोठा दाब असल्याने पाणी पातळी रिकामी करून हे काम करावे लागणार आहे. यासाठी पाटबंधारे विभाग महापालिकेला तांत्रिक मदत करेल. पण लवकरात लवकर ही गळती काढली नाही तर पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्यावरही याचा परिणाम होणार आहे.

संदीप दवणे, शाखा अभियंता पाटबंधारे.

फोटो

: १६ शिंगणापूर बंधारा

शिंगणापूर येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या बंधाऱ्याला तळ बाजूने गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाहून जात आहे.