शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शिंगणापूर बंधाऱ्यातून लाखो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:22 IST

कोपार्डे: शहराला पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. ...

कोपार्डे: शहराला पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. शिंगणापूर बंधाऱ्याची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणातून सातत्याने पाणी सोडावे लागत असल्याने पाटबंधारे विभागावर पाणी नियोजनाचा ताण पडत आहे.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाणी दिले जात आहे. या धरणातील ७६.६५ द.ल.घ.मी पाणीसाठा कोल्हापूरसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून भोगावती नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी शिंंगणापूरजवळील महापालिकेच्या मालकीच्या बंधाऱ्यात अडवून शहराला पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येते. मात्र, शिंगणापूर बंधाऱ्याचे उजवीकडून ४, ५ व ८ नंबरचे लाकडी बरगे व स्टील गंजल्याने यातून पर सेकंद २.५० क्यूसेस पाणी वाहून जात आहे. पंपिंग स्टेशनला लागणारी पाण्याची पातळी राखण्यासाठी सातत्याने भोगावती नदीत धरणातून पाणी सोडावे लागत आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होत असल्याने पावसाळा लांबल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यावरही गंडांतर येणार आहे. यासाठी महानगरपालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून गळती काढणे गरजेचे आहे.

चौकट : पाणबुड्या आणून पाटबंधारे विभागाने चार पाच व आठ नंबरच्या गळ्यातील गळती काढण्याचा प्रयत्न केला होता. पण येथे पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने ते शक्य झाले नाही. यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शिरोळपर्यंत पाणी पोहोचत आहे. सडलेले बरगे बदलण्यासाठी महापालिकेने टेंडरही दिले आहे. पण ती बदलण्यासाठी नियोजन नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोट : गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेबरोबर या बंधाऱ्यातील गळती काढण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. या ठिकाणी पाण्याचा मोठा दाब असल्याने पाणी पातळी रिकामी करून हे काम करावे लागणार आहे. यासाठी पाटबंधारे विभाग महापालिकेला तांत्रिक मदत करेल. पण लवकरात लवकर ही गळती काढली नाही तर पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्यावरही याचा परिणाम होणार आहे.

संदीप दवणे, शाखा अभियंता पाटबंधारे.

फोटो

: १६ शिंगणापूर बंधारा

शिंगणापूर येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या बंधाऱ्याला तळ बाजूने गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाहून जात आहे.