शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
7
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
8
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
9
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
10
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
11
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
12
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
13
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
14
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
16
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
17
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
18
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
19
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
20
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ

दूध, भाजीपाला, गॅस घरपोच, तर इंधन अत्यावश्यक वाहनांसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात उद्या, शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनअंतर्गत सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ...

कोल्हापूर : जिल्ह्यात उद्या, शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनअंतर्गत सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते ७ या वेळेत फक्त दूध, भाजीपाला व गॅसची घरपोच सेवा व विक्रीला परवानगी असेल. रस्त्यावर येण्यास नागरिकांना पूर्णत: मनाई असून केवळ औषध दुकाने सुरू राहतील, तर पेट्राेल, डिझेल अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठीच देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुुरुवारी सायंकाळी ही नियमावली जाहीर केली.

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हा पोलीस प्रशासन व महापालिकेच्या संयुक्त बैठकीत, उद्या, शनिवारी मध्यरात्रीपासून आठ दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्याची सविस्तर नियमावली जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली.

यानुसार जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व उद्योग, व्यापारी व इतर आस्थापना, कार्यालये व सेवा पुरवणारे घटक बंद ठेवण्यात येणार आहेत.

या कालावधीत नागरिकांना घराबाहेर येण्यास व रस्त्यावर फिरण्यास सक्त मनाई असेल. दूध, भाजीपाला व गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते ७ या वेळेत घरपोच वितरण करण्यात येईल. कड़क लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनदेखील सज्ज असून नियोजनाची बैठक आज, शुक्रवारी होणार आहे.

--

हे राहणार सुरू -

- वृत्तपत्र वितरण, एटीएम, पोस्ट कार्यालये

- दोन टप्प्यात दूध, भाजी, गॅसची घरपोच विक्री व वाहतूक

- वैद्यकीय सुविधा, आवश्यक सर्व उत्पादन, विक्री, वितरण, औषध निर्मिती व त्यासाठी कच्चा माल पुरवठा करणारे उद्योग

- ऑक्सिजन उत्पादन व पुरवठा

- शेतीशी निगडित व मान्सूनपूर्व कामे

- डिझेल, पेट्रोल केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी

- शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेची व आरोग्य सेवेतील कार्यालये १५ टक्के उपस्थितीसह. न्यायालयीन कामकाज

- इंटरनेट यंत्रणा, दूरध्वनी, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये

- सर्व प्रकारची मालवाहतूक

---

लॉकडाऊनचा कालावधी

उद्या, शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी (दि. २३) रात्री १२ वाजेपर्यंत.

--

राज्य शासनाचीही नियमावली जाहीर

राज्य शासनानेदेखील लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवला असून सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहतील. याअंतर्गत अन्य तसेच बाधित राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी ४८ तासाच्या आधी केलेल्या आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणीचा अहवाल बंधनकारक असेल. हा अहवाल ७ दिवसांपर्यंत ग्राह्य धरला जाईल.

---