शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सव्वालाख नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

कोल्हापूर : यंदाच्या महापुरात बाधित झालेल्या १८६ गावांतील १ लाख २८ हजार २७६ जणांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महसूल ...

कोल्हापूर : यंदाच्या महापुरात बाधित झालेल्या १८६ गावांतील १ लाख २८ हजार २७६ जणांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महसूल प्रशासन तयार करीत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गावांच्या स्थलांतरासाठी १५०७ हेक्टर जमिनीची गरज आहे. हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सरकारने मान्यता दिल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे.

जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे महापूर आला. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने डोंगरालगतच्या गावांना धोका निर्माण झाला. डोंगर खचण्याचे प्रकार झाले. यामुळे पूरग्रस्त आणि धोकादायक गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने केला आहे. गावनिहाय स्थलांतर करण्याची आवश्यकता असलेली कुटुंबे, त्यामधील सदस्य यांची माहिती घेतली आहे. पुनर्वसनासाठी त्याच गावात सरकारी जमीन उपलब्ध असल्याचा गट नंबर आणि जमिनीचे क्षेत्र एकत्रित केले आहे. महसूल प्रशासन असा प्रस्ताव केला तरी संबंधित ग्रामस्थांची कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी संमती महत्त्वाची ठरणार आहे. वर्षानुवर्ष आम्ही राहत असलेल्या ठिकाणीच आमची शेती आहे, रोजगार आहे, उद्योग आहे, त्यामुळे आम्ही गाव सोडणार नाही, अशी भूमिका घेतल्यास महसूल विभागाने तयार केलेल्या प्रस्तावाला केराची टोपलीची किंमत राहणार आहे. दरम्यान, करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीच्या पुनर्वसनासाठी १९८९ सरकारने पर्यायी ९० एकरची जागा दिली, पण अजूनही सर्व ग्रामस्थ पुनर्वसनाच्या जागेत स्थलांतर झालेले नाहीत. हा अनुभव महसूल प्रशासनालाही आला असला तरी प्रत्येक वर्षी बाधित गावांना नुकसानभरपाई देण्याऐवजी कायमचे पुनर्वसन केलेले चांगलेे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

चौकट

सर्वाधिक गावे शिरोळ तालुक्यातील

पुनवर्सनासाठीचे प्रस्तावित गावांची संख्या तालुकानिहाय अशी कंसात लोकसंख्या : करवीर १ (१३२९), गगनबावडा २५ (२३७०), पन्हाळा ६ (३८९२), शाहूवाडी २१ (६६९४), हातकणंगले १३ (१२२७६), शिरोळ ३८ (८६८४०), कागल ५ (३५८४), भुदरगड १२(१३९९), आजरा १(२४), गडहिंग्लज २५(७३४८), चंदगड ३९(२५२०).

चौकट

शासकीय जमिनीवर अतिक्रमण

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारची जमीन आहे, पण त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ते काढण्यासाठी गेल्यानंतर गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील राजकीय लोकांचा शासकीय यंत्रणेवर दबाव वाढतो. कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे पूरग्रस्तांना खुल्या जमीन मिळण्यात अडचणी येत आहेत.

कोट

पूरग्रस्त आणि डोंगरालगतच्या धोकादायक गावांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिल्यानंतर पुढील कार्यवाही होईल.

श्रावण क्षीरसागर,

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी.