शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील सुमारे अडीचशे कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत महापुराचा फटका बसलेल्या सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांना महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत महापुराचा फटका बसलेल्या सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांना महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून सुरक्षित सुटका केली. या सर्व कुटुंबांची महापालिकेने केलेल्या निवारा केंद्रातून राहण्याची सोय करण्यात आली आहे.

शहरात महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम गुरुवारी सायंकाळपासून सुरू होते. नागरिकांना आवाहन करूनही त्यांनी घरातून बाहेर पडण्यास उशीर केल्यामुळे शुक्रवारी पाणी घरात शिरायला लागल्यावर एकच धांदल उडाली. दुधाळी, उत्तरेश्वर, शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, खानविलकर पेट्रोल पंप, रमणमळा, न्यू पॅलेस मागील बाजू, बुद्धविहार कॉलनी, जिव्हाळा कॉलनी, कदमवाडी, जाधववाडी परिसरातील २०० ते २५० कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले होते.

शुक्रवार पेठ परिसरात ग. गो. जाधव विद्यालय, गुणे बोळ परिसर, जगद्गुरू मठ, मस्कृती तलाव परिसर, शिंगणापूर नाका परिसरात पुराचे पाणी वाढल्याने तेथील सर्व नागरिकांना ग.गो. जाधव शाळेत, तसेच राजमाता हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी या भागात फिरती करून लोकांना स्थलांतरचे आवाहन केले. सिद्धार्थनगर येथील तीन कुटुंबांतील १२ नागरिकांचे समाजमंदिर येथे स्थलांतर करण्यात आले आहे.

जिव्हाळा कॉलनी येथील १०० नागरिकांना फुलेवाडी शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. माजी नगरसेवक राहुल माने यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला.

पंचगंगा नदी रस्त्यावरील ५० नागरिकांना ग. गो. जाधव शाळेत स्थलांतरित केले. मस्कृती तलाव येथील नागरिकांना भजनी मंडळ उत्तरेश्वर महादेव मंदिराजवळील हॉलमध्ये आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले. सिद्धार्थनगर येथील दोन कुटुंबातील आठ व्यक्ती आंबेडकर शाळेत आहेत.

बुद्धविहार हॉल येथे तीन कुटुंबांतील १० व्यक्तींना, तर सीता कॉलोनी येथील २८ नागरिकांना सारस्वत हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. के.एम.सी. कॉलेज येथे गवत मंडई परिसरातील ३० जनावरांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

शाहुपुरी व्यापार पेठ अंबाबाई शाळेतील निवारा केंद्रात १५ कुटुंबांतील ६५ व्यक्तींना, तर सिद्धार्थनगर येथील डॉ. आंबेडकर विद्यालय येथे एकूण पाच कुटुंबांतील २३, ज्ञानेश्वर भजनी मंडळ विठ्ठल मंदिर येथे आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले.