शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरातील सुमारे अडीचशे कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत महापुराचा फटका बसलेल्या सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांना महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत महापुराचा फटका बसलेल्या सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांना महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून सुरक्षित सुटका केली. या सर्व कुटुंबांची महापालिकेने केलेल्या निवारा केंद्रातून राहण्याची सोय करण्यात आली आहे.

शहरात महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम गुरुवारी सायंकाळपासून सुरू होते. नागरिकांना आवाहन करूनही त्यांनी घरातून बाहेर पडण्यास उशीर केल्यामुळे शुक्रवारी पाणी घरात शिरायला लागल्यावर एकच धांदल उडाली. दुधाळी, उत्तरेश्वर, शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, खानविलकर पेट्रोल पंप, रमणमळा, न्यू पॅलेस मागील बाजू, बुद्धविहार कॉलनी, जिव्हाळा कॉलनी, कदमवाडी, जाधववाडी परिसरातील २०० ते २५० कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले होते.

शुक्रवार पेठ परिसरात ग. गो. जाधव विद्यालय, गुणे बोळ परिसर, जगद्गुरू मठ, मस्कृती तलाव परिसर, शिंगणापूर नाका परिसरात पुराचे पाणी वाढल्याने तेथील सर्व नागरिकांना ग.गो. जाधव शाळेत, तसेच राजमाता हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी या भागात फिरती करून लोकांना स्थलांतरचे आवाहन केले. सिद्धार्थनगर येथील तीन कुटुंबांतील १२ नागरिकांचे समाजमंदिर येथे स्थलांतर करण्यात आले आहे.

जिव्हाळा कॉलनी येथील १०० नागरिकांना फुलेवाडी शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. माजी नगरसेवक राहुल माने यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला.

पंचगंगा नदी रस्त्यावरील ५० नागरिकांना ग. गो. जाधव शाळेत स्थलांतरित केले. मस्कृती तलाव येथील नागरिकांना भजनी मंडळ उत्तरेश्वर महादेव मंदिराजवळील हॉलमध्ये आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले. सिद्धार्थनगर येथील दोन कुटुंबातील आठ व्यक्ती आंबेडकर शाळेत आहेत.

बुद्धविहार हॉल येथे तीन कुटुंबांतील १० व्यक्तींना, तर सीता कॉलोनी येथील २८ नागरिकांना सारस्वत हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. के.एम.सी. कॉलेज येथे गवत मंडई परिसरातील ३० जनावरांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

शाहुपुरी व्यापार पेठ अंबाबाई शाळेतील निवारा केंद्रात १५ कुटुंबांतील ६५ व्यक्तींना, तर सिद्धार्थनगर येथील डॉ. आंबेडकर विद्यालय येथे एकूण पाच कुटुंबांतील २३, ज्ञानेश्वर भजनी मंडळ विठ्ठल मंदिर येथे आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले.