शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

कोल्हापूर शहरातील सुमारे अडीचशे कुटुंबांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:15 IST

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत महापुराचा फटका बसलेल्या सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांना महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून ...

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीत महापुराचा फटका बसलेल्या सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांना महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी महापुराच्या पाण्यातून सुरक्षित सुटका केली. या सर्व कुटुंबांची महापालिकेने केलेल्या निवारा केंद्रातून राहण्याची सोय करण्यात आली आहे.

शहरात महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम गुरुवारी सायंकाळपासून सुरू होते. नागरिकांना आवाहन करूनही त्यांनी घरातून बाहेर पडण्यास उशीर केल्यामुळे शुक्रवारी पाणी घरात शिरायला लागल्यावर एकच धांदल उडाली. दुधाळी, उत्तरेश्वर, शुक्रवार पेठ, मस्कुती तलाव, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, खानविलकर पेट्रोल पंप, रमणमळा, न्यू पॅलेस मागील बाजू, बुद्धविहार कॉलनी, जिव्हाळा कॉलनी, कदमवाडी, जाधववाडी परिसरातील २०० ते २५० कुटुंबांना स्थलांतर करण्यात आले होते.

शुक्रवार पेठ परिसरात ग. गो. जाधव विद्यालय, गुणे बोळ परिसर, जगद्गुरू मठ, मस्कृती तलाव परिसर, शिंगणापूर नाका परिसरात पुराचे पाणी वाढल्याने तेथील सर्व नागरिकांना ग.गो. जाधव शाळेत, तसेच राजमाता हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले. उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी या भागात फिरती करून लोकांना स्थलांतरचे आवाहन केले. सिद्धार्थनगर येथील तीन कुटुंबांतील १२ नागरिकांचे समाजमंदिर येथे स्थलांतर करण्यात आले आहे.

जिव्हाळा कॉलनी येथील १०० नागरिकांना फुलेवाडी शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. माजी नगरसेवक राहुल माने यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला.

पंचगंगा नदी रस्त्यावरील ५० नागरिकांना ग. गो. जाधव शाळेत स्थलांतरित केले. मस्कृती तलाव येथील नागरिकांना भजनी मंडळ उत्तरेश्वर महादेव मंदिराजवळील हॉलमध्ये आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले. सिद्धार्थनगर येथील दोन कुटुंबातील आठ व्यक्ती आंबेडकर शाळेत आहेत.

बुद्धविहार हॉल येथे तीन कुटुंबांतील १० व्यक्तींना, तर सीता कॉलोनी येथील २८ नागरिकांना सारस्वत हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले. के.एम.सी. कॉलेज येथे गवत मंडई परिसरातील ३० जनावरांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

शाहुपुरी व्यापार पेठ अंबाबाई शाळेतील निवारा केंद्रात १५ कुटुंबांतील ६५ व्यक्तींना, तर सिद्धार्थनगर येथील डॉ. आंबेडकर विद्यालय येथे एकूण पाच कुटुंबांतील २३, ज्ञानेश्वर भजनी मंडळ विठ्ठल मंदिर येथे आठ कुटुंबातील ४० व्यक्तींना स्थलांतरित केले.