शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘म्हैसाळ’चे पाणी नियोजन कोलमडले

By admin | Updated: February 28, 2016 00:25 IST

सात दिवसातच योजना बंद : कवठेमहांकाळ तालुका तहानलेलाच

लखन घोरपडे  देशिंग चार-पाच महिन्यांपासून बंद असलेली म्हैसाळ योजना अखेर साखर कारखानदार व शेतकऱ्यांनी भरलेल्या रकमेतून सुरू झाली, मात्र ही योजना सुरू होऊनही त्यामागची समस्या अजूनही सुटलेली नाही. शनिवार, दि. २० रोजी सुरू झालेली म्हैसाळ योजना सात दिवसांमध्ये तीन दिवस बंद राहिली आहे. त्यामुळे योजनेच्या पाणी वाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या योजनेचे पाणी मळणगावपासून (ता. कवठेमहांकाळ) पुढे गेले आहे. मात्र पाणी सुरू झाल्यापासून तीन दिवस योजना बंद राहिल्याने पुढील गावांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे. त्यातच कालव्याला मोठ्या प्रमाणावर गळती असल्याने पाणी पुढे सरकण्यास वेळ लागत आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी नरवाड, आरग, बेडग, सलगरे यामार्गे कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये दाखल झाले. मात्र गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या योजनेच्या पाण्यापासून तालुक्यातील एकही तलाव अथवा नाला भरला नाही. पाणी वाटपाचे कोणतेही नियोजन नसल्याने सतत आवर्तन बंद होत आहे. त्यात तांत्रिक बिघाडही होत आहे . एकंदरीतच केवळ ४५ दिवसांसाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्याला पाणी मिळणार तरी केव्हा? असा सवाल शेतकरी करू लागले आहेत . शनिवार, दि . २० रोजी पाटबंधारे विभागाने ही योजना सुरू केली; मात्र प्रत्येक तालुक्यासाठी पाणी कसे द्यायचे, याचे नियोजन या विभागाने केले नाही. ४५ दिवसांपैकी आठ दिवस चालू-बंद अवस्थेतच निघून गेले. त्यातच काही शेतकरी अग्रणी नदीमध्ये पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत, तर काही भागातून तालुक्यातील तलाव भरून द्या, अशी मागणी होत आहे. परंतु थोड्याच कालावधीसाठी सुटलेले पाणी शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न अता उपस्थित होऊ लागला आहे . दरम्यान, म्हैसाळ योजनेपासून निर्माण करण्यात आलेल्या बनेवाडी, डोंगरवाडी उपसा सिंचन योजनांसह पोटकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी या परिसरातील शेतकरी करू लागले आहेत. त्यातच सध्या पाण्याची अत्यंत गरज असलेल्या जत तालुक्याला पाणी देण्याचा विचारच प्रशासनाने केला नसल्याचे दिसून येते. म्हैसाळ योजनेच्या कालव्याला सलगरेपासून कोंगनोळी, कुकटोळी, सराटी, शिंदेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती सुरू असून, दररोज लाखो लिटर पाणी फोंड्या माळावर वाया जात आहे .