शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
2
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
3
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
4
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
5
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
6
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
7
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
8
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
9
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
10
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
11
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
12
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
13
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
14
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
15
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
16
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
17
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
18
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
19
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
20
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने

विनावापर भूखंड ‘म्हाडा’ परत घेणार

By admin | Updated: May 6, 2015 00:41 IST

रवींद्र वायकर : नव्या वसाहती, घरांसाठी ४४ हेक्टरची मागणी

कोल्हापूर : गेल्या ३० वर्षांपूर्वी ज्या लोकांनी म्हाडाच्या योजनेंतर्गत भूखंड घेतले, मात्र त्यांनी ते विकसित केलेले नाही, अशा लोकांना नोटीस पाठवून ते भूखंड शासनाच्या ताब्यात घेतले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील म्हाडाच्या नव्या वसाहती आणि घरांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ४४ हेक्टर जमिनीची मागणी केली आहे. राज्यातील जनतेला किफायतशीर घरे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी मंगळवारी येथे दिली.कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री वायकर म्हणाले, जिल्ह्यात १९८५ मध्ये काहींंनी घरे बांधण्यासाठी ‘म्हाडा’तून भूखंड घेतले. मात्र, अद्यापही त्यांनी ते विकसित केले नाहीत. ते ताब्यात घेतले जातील. कोल्हापुरात म्हाडाकडे दोन हेक्टर जागा उरली आहे. नवीन घरे, वसाहती बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे ४४ हेक्टर जमिनीची मागणी केली आहे. यात शेंडापार्क, कागल, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज, चंदगड येथील जमिनींचा समावेश आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडे एक कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याची वसुली सुरू केली असून, पंधरा दिवसांत ६८ लाख रुपये वसूल केले. ठेकेदार म्हणून कामाची तयारी असल्यास बांधकाम व्यावसायिकांची म्हाडा मदत घेईल. पंतप्रधान मोदी यांचे सर्वांना किफायतशीर, परवडणारी घरे देण्याचे ध्येय आहे. ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. दर्जेदार, टिकाऊ, गुणवत्तापूर्ण घरे देण्याचाही प्रयत्न राहील. म्हाडाच्या साचेबंदपणाला बगल देऊन समितीवर तज्ज्ञ आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिकांची नियुक्ती करु. त्याद्वारे घरांची रचना, टिकाऊपणा, आदींबाबत बदल केले जातील. बांधकामातील रिफ्यूज एरिया, एटीपी प्लँट, आदींबाबतचे नियम शिथिल करण्याचा विचार आहे. (प्रतिनिधी)‘सीईटी’मध्ये बदलाचा विचारवैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत राज्यपातळीवर एकच प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय चांगला आहे. त्यामुळे सीईटीतील अनागोंदीला लगाम बसणार असल्याचे मंत्री वायकर यांनी सांगितले. नकारात्मक मार्किंग पद्धत आदींच्यादृष्टीने ‘सीईटी’च्या स्वरूपात बदल करण्याचा विचार आहे. शिवाजी विद्यापीठाचा शासन दरबारी प्रलंबित असलेला सुवर्णमहोत्सवी निधी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठांतील ज्या विद्याशाखांमध्ये विद्यार्थ्यांचा अभाव आहे, ते बंद करण्याचा विचार आहे. तासिका तत्त्वावरील प्राध्यापक हे तत्त्व मान्य नाही. त्यामुळे महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी नियुक्तीला प्राधान्य राहणार आहे.