कोल्हापूर : प्रत्येक संशोधकाने संशोधन अहवालाचे लेखन करताना संशोधन विषय, संशोधन पद्धती आणि अहवाल लेखनाची भाषा या गोष्टी सातत्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यामुळे संशोधन गुणवत्तापूर्ण, दर्जेदार व उपयुक्त होईल, असे प्रतिपादन कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. ए. एम. गुरव यांनी रविवारी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्यावतीने संशोधन पद्धती या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानमालेतील संशोधन अहवाल लेखन या विषयावरील पाचवे पुष्प त्यांनी गुंफले. संशोधन अहवाल हा आपल्या संशोधन कार्याचा निरंतर जपला जाणारा पुरावा असतो. यासाठी अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास करावा. सूक्ष्मतेने त्या माहितीचे अहवाल लेखन करणे गरजेचे असल्याचे डॉ. गुरव यांनी सांगितले.
संशोधन ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून या प्रक्रियेसाठी आवश्यक तात्त्विक माहितीचा प्रत्येक संशोधकाने अभ्यास करणे गरजेचे आहे. आपण ज्यावेळी संशोधन अहवाल लेखनाच्या टप्प्यावर येतो, तेव्हा आपल्या विषयाची सर्व माहिती आपल्यासमोर असली पाहिजे. यासाठी संशोधनाच्या सुरुवातीपासून संशोधनाच्या सर्व नोंदी करून ठेवण्याची सवय लावून घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
महेश चव्हाण यांनी आभार मानले.
फोटो (२३०५२०२१-कोल-ए एम गुरव (विद्यापीठ)
===Photopath===
230521\23kol_1_23052021_5.jpg
===Caption===
फोटो (२३०५२०२१-कोल-ए एम गुरव (विद्यापीठ)