शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

आजपासून सरसकट दुकाने सुरू करण्यावर व्यापारी ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:17 IST

कोल्हापूर : शहरातील व्यापारी, दुकानदार आज, सोमवारपासून दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. पण सरकारने रविवारी रात्री उशिरापर्यंत सरसकट दुकाने ...

कोल्हापूर : शहरातील व्यापारी, दुकानदार आज, सोमवारपासून दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. पण सरकारने रविवारी रात्री उशिरापर्यंत सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. तरीही सरसकट दुकाने सुरू झाल्यास व्यापारी आणि महापालिका, पोलिसांचे कारवाई पथक आमने, सामने येऊन संघर्ष होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात व्यापारी आक्रमक झाल्यानंतर सरकारने पाच दिवस प्रायोगिक तत्त्वावर सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. त्याची मुदत शुक्रवारी संपली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात अत्यावश्यक सेवा, सुविधा वगळता इतर दुकाने उघण्यावर निर्बंध लावले आहेत. पण हे निर्बंध व्यापाऱ्यांना मान्य नाहीत. शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्क्याच्या आत आहे. यामुळे सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर रविवारी रात्री उशिरापर्यंत निर्णय झालेला नाही. म्हणून सराफ संघाने दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राजारामपुरी व्यापारी असोसिएशननेही सायंकाळी बैठक घेऊन व्यापारी दुकाने सुरू करण्यावर ठाम आहेत. सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे हेही आमदार चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क साधून सरकारी पातळीवर परवानगीसाठी पाठपुरावा करीत राहिले. अधिकृत परवानगी नाही मिळाली तरी शहरातील सरसकट दुकाने सुरू झाल्यानंतर प्रशासन कोणती भूमिका घेणार, यासंबंधी उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, गेल्या रविवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्यासंबंधीचा इशारा दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने शहरातून संचलन करून व्यापारी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. अशाप्रकारचे पाऊल यावेळी पोलिसांकडून उचलण्यात आलेेले नाही. म्हणून दुकाने उघडल्यानंतर पोलीस कारवाई करणार काय, यासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे. जर कारवाई केली तर संघर्ष अटळ आहे. व्यापाऱ्यांच्या असंतोषला लोकप्रतिनिधींनाही सामोरे जावे लागणार आहे. यामुळे अधिकृत परवानगी नाही मिळाली तरी व्यापक प्रमाणात कारवाई नाही झाली तर सरसकट दुकाने उघडण्यास मूकसंमती असल्याचा संदेश जाणार आहे.