शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अडत भरायची नसेल तर व्यापाऱ्यांच्या दारात माल

By admin | Updated: July 16, 2016 00:32 IST

राजू शेट्टी : मुंबईत भाजी मार्केट सुरू करण्याची खोत यांची घोषणा

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न असून, अडत भरायची नसेल तर बाजार समितीच्या बाहेर व्यापारी सांगतील तिथे माल पोहोचविला जाईल; पण भांडण लावून आपली पोळी भाजून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्यांना दिला. नियमन व अडत याबाबत शुक्रवारी बाजार समितीत झालेल्या बैठकीत काळानुरूप बाजार समित्यांनीही बदलले पाहिजे, अशी भूमिका मांडत त्यांनी व्यापाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. शेतकऱ्यांनी माल पिकविला तर आपण खाणार, याचे भान व्यापाऱ्यांनी ठेवावे. किरकोळ व्यापारी येथून पाच टक्केच माल खरेदी करतात. मग त्यांच्यासाठी ९५ टक्के बड्या व्यापाऱ्यांचा फायदा का करता? लिलावात कमी दराने मागितले म्हणून शेतकरी कधी तुमच्याशी भांडत नाहीत. मध्यस्थी कमी करून ग्राहकांना स्वस्तात व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला अडत भरायची नसेल तर शेतकऱ्यांना सांगा. समितीच्या बाहेर सांगाल तिथे माल पोहोचविला जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले. समित्याही टिकल्या पाहिजेत; पण त्यांनीही बदलून आॅनलाईन ट्रेडिंग सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, व्यापाऱ्यांना समितीबरोबर समितीच्या बाहेर खरेदीसाठी लायसेन्स दिली जाणार असून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी तयार व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्ड स्टोअरेज, शेतीमालावर बॅँक कर्ज, आदी बाबी प्रामुख्याने करणार आहेच. त्याबरोबर शेतकरी मंडळ, भाजीपाला सहकारी संस्थांच्या माध्यमातून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणार असून पुणे गृहनिर्माण संस्थेत असा प्रयोग सुरू केला आहे. आरे (मुंबई) दूध विक्री केंद्राच्या ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करणार आहे. (प्रतिनिधी)...तर समित्यांच्या पाठीशी सरकार बाजार समित्यांनी कामाची पद्धत बदलली पाहिजे. नुसते घेणाऱ्यांवर व देणाऱ्यांवर अवलंबून राहिलात तर टिकणार नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी करून थेट ग्राहकांना विक्री करण्यास सुरुवात केली पाहिजे. शहरात स्वत:ची विक्री केंद्रे सुरू करावीत, अशा बाजार समित्यांच्या पाठीशी सरकार राहील, अशी ग्वाही सदाभाऊ खोत यांनी दिली. बाराजणांची अभ्यास समितीअडतीबाबत नेमल्या जाणाऱ्या समितीत बाराजणांचा समावेश असून मोठ्या बाजार समित्यांच्या प्रतिनिधींसह सर्व घटकांना सामावून घेणार आहे. यामध्ये कोल्हापूरच्या दोन-तीनजणांना प्रतिनिधित्व देऊ. ही समिती ६ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.