शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

अडत भरायची नसेल तर व्यापाऱ्यांच्या दारात माल

By admin | Updated: July 16, 2016 00:32 IST

राजू शेट्टी : मुंबईत भाजी मार्केट सुरू करण्याची खोत यांची घोषणा

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न असून, अडत भरायची नसेल तर बाजार समितीच्या बाहेर व्यापारी सांगतील तिथे माल पोहोचविला जाईल; पण भांडण लावून आपली पोळी भाजून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी व्यापाऱ्यांना दिला. नियमन व अडत याबाबत शुक्रवारी बाजार समितीत झालेल्या बैठकीत काळानुरूप बाजार समित्यांनीही बदलले पाहिजे, अशी भूमिका मांडत त्यांनी व्यापाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. शेतकऱ्यांनी माल पिकविला तर आपण खाणार, याचे भान व्यापाऱ्यांनी ठेवावे. किरकोळ व्यापारी येथून पाच टक्केच माल खरेदी करतात. मग त्यांच्यासाठी ९५ टक्के बड्या व्यापाऱ्यांचा फायदा का करता? लिलावात कमी दराने मागितले म्हणून शेतकरी कधी तुमच्याशी भांडत नाहीत. मध्यस्थी कमी करून ग्राहकांना स्वस्तात व शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला अडत भरायची नसेल तर शेतकऱ्यांना सांगा. समितीच्या बाहेर सांगाल तिथे माल पोहोचविला जाईल, असे शेट्टी यांनी सांगितले. समित्याही टिकल्या पाहिजेत; पण त्यांनीही बदलून आॅनलाईन ट्रेडिंग सुरू करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, व्यापाऱ्यांना समितीबरोबर समितीच्या बाहेर खरेदीसाठी लायसेन्स दिली जाणार असून उत्पादक ते ग्राहक अशी साखळी तयार व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. कोल्ड स्टोअरेज, शेतीमालावर बॅँक कर्ज, आदी बाबी प्रामुख्याने करणार आहेच. त्याबरोबर शेतकरी मंडळ, भाजीपाला सहकारी संस्थांच्या माध्यमातून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणार असून पुणे गृहनिर्माण संस्थेत असा प्रयोग सुरू केला आहे. आरे (मुंबई) दूध विक्री केंद्राच्या ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्र सुरू करणार आहे. (प्रतिनिधी)...तर समित्यांच्या पाठीशी सरकार बाजार समित्यांनी कामाची पद्धत बदलली पाहिजे. नुसते घेणाऱ्यांवर व देणाऱ्यांवर अवलंबून राहिलात तर टिकणार नाही. शेतकऱ्यांकडून खरेदी करून थेट ग्राहकांना विक्री करण्यास सुरुवात केली पाहिजे. शहरात स्वत:ची विक्री केंद्रे सुरू करावीत, अशा बाजार समित्यांच्या पाठीशी सरकार राहील, अशी ग्वाही सदाभाऊ खोत यांनी दिली. बाराजणांची अभ्यास समितीअडतीबाबत नेमल्या जाणाऱ्या समितीत बाराजणांचा समावेश असून मोठ्या बाजार समित्यांच्या प्रतिनिधींसह सर्व घटकांना सामावून घेणार आहे. यामध्ये कोल्हापूरच्या दोन-तीनजणांना प्रतिनिधित्व देऊ. ही समिती ६ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.