शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

जेवणाचे बिल खानसाम्याला परत देणारा मंत्री देशमुख आबांच्या आठवणी : विविध लढ्यांत होते अग्रभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

कोल्हापूर : ही गोष्ट साधारणत: २००० सालातील..तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे पणनमंत्री होते. ...

कोल्हापूर : ही गोष्ट साधारणत: २००० सालातील..तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे पणनमंत्री होते. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामगृहात त्यांना भेटण्यासाठी ‘शेकाप’सह अनेक पक्षांचे कार्यकर्ते आले होते. दौरा संपवून मुंबईकडे जाताना, त्यांनी तेथील खानसामाला रजिस्टर घेऊन बोलावले. त्यामध्ये जेवढे चहा-पाणी, जेवण झाले त्याचे पैसे दिले. त्याचबरोबर माझ्या दौऱ्यामुळे आणखी कोणी जेऊन गेले असेल तर तेही घे. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांकडून याचे पैसे घ्यायचे नाहीत, असे बजावले. आपल्या जेवणाचे पैसे स्वत: मंत्रीच बोलावून देत असल्याचे पाहून खानसामाही अवाक्‌ झाला..असा मंत्री महाराष्ट्राने पुन्हा पाहिला नाही. देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या चारित्र्याच्या आठवणी शनिवारी पुन्हा ताज्या झाल्या. असा एखादा आमदार, मंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेला असा विश्वास पुढील पिढी ठेवणार नाही इतके मोठेपण त्यांनी वागणुकीतून दाखवून दिले.

‘शेकाप’चे दिवंगत नेते गणपतराव देशमुख आणि कोल्हापूर यांचे नाते खूप वेगळे आहे. डाव्या विचाराच्या प्रवासात त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यासह कोल्हापुरात झालेल्या कष्टकरी, श्रमजीवी लोकांच्या आंदोलनात अग्रभागी राहिले. सीमा लढ्याच्या आंदोलनात ते उभे राहिलेच, त्याशिवाय विधिमंडळात सर्वांत अधिक आक्रमकपणे त्यांनी सीमा बांधवांच्या भावना मांडल्या. देशमुख विविध आंदोलनांसाठी कोल्हापुरात येत होते. मात्र, ३१ जानेवारी २०२० ला ‘शेकाप’च्या वतीने ७५ वर्षे निष्ठेने पक्षात असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार देशमुख यांच्या हस्ते होता. त्यासाठी ते शेवटचे कोल्हापुरात आले होते.

‘खावटी’ कर्ज माफ करणारे कृषिमंत्री

गणपतराव देशमुख यांचे आयुष्यच कष्टकऱ्यांच्या लढ्यासाठी गेले. ज्या-ज्या वेळी सत्तेची संधी मिळाली, त्या-त्या वेळी त्यांनी उठावदार काम केले. १९७८ ला ते कृषिमंत्री असताना विकास संस्थांच्या पातळीवर शेतकऱ्यांनी उचल केलेल्या १५३ कोटींचे खावटी कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

-----------

शेकापचा विचार व्यक्तीरूपाने त्यांच्यामध्ये होता. हा विचार कशा पद्धतीने अमलात येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख होते. राजकारणात पदे मिळविण्यास विचार व तत्त्वज्ञान गहाण ठेवून कधी काही केले नाही. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतही ते आले असते. मात्र, तत्त्वज्ञान सोडून काही केले नाही, अशी माणसे फार दुर्मीळ होत आहेत. त्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न आम्ही केला.

- संपतराव पवार

माजी आमदार शेकाप, कोल्हापूर