शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

जेवणाचे बिल खानसाम्याला परत देणारा मंत्री देशमुख आबांच्या आठवणी : विविध लढ्यांत होते अग्रभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

कोल्हापूर : ही गोष्ट साधारणत: २००० सालातील..तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे पणनमंत्री होते. ...

कोल्हापूर : ही गोष्ट साधारणत: २००० सालातील..तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार होते. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे पणनमंत्री होते. कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना शासकीय विश्रामगृहात त्यांना भेटण्यासाठी ‘शेकाप’सह अनेक पक्षांचे कार्यकर्ते आले होते. दौरा संपवून मुंबईकडे जाताना, त्यांनी तेथील खानसामाला रजिस्टर घेऊन बोलावले. त्यामध्ये जेवढे चहा-पाणी, जेवण झाले त्याचे पैसे दिले. त्याचबरोबर माझ्या दौऱ्यामुळे आणखी कोणी जेऊन गेले असेल तर तेही घे. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांकडून याचे पैसे घ्यायचे नाहीत, असे बजावले. आपल्या जेवणाचे पैसे स्वत: मंत्रीच बोलावून देत असल्याचे पाहून खानसामाही अवाक्‌ झाला..असा मंत्री महाराष्ट्राने पुन्हा पाहिला नाही. देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या चारित्र्याच्या आठवणी शनिवारी पुन्हा ताज्या झाल्या. असा एखादा आमदार, मंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेला असा विश्वास पुढील पिढी ठेवणार नाही इतके मोठेपण त्यांनी वागणुकीतून दाखवून दिले.

‘शेकाप’चे दिवंगत नेते गणपतराव देशमुख आणि कोल्हापूर यांचे नाते खूप वेगळे आहे. डाव्या विचाराच्या प्रवासात त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यासह कोल्हापुरात झालेल्या कष्टकरी, श्रमजीवी लोकांच्या आंदोलनात अग्रभागी राहिले. सीमा लढ्याच्या आंदोलनात ते उभे राहिलेच, त्याशिवाय विधिमंडळात सर्वांत अधिक आक्रमकपणे त्यांनी सीमा बांधवांच्या भावना मांडल्या. देशमुख विविध आंदोलनांसाठी कोल्हापुरात येत होते. मात्र, ३१ जानेवारी २०२० ला ‘शेकाप’च्या वतीने ७५ वर्षे निष्ठेने पक्षात असलेल्या ज्येष्ठांचा सत्कार देशमुख यांच्या हस्ते होता. त्यासाठी ते शेवटचे कोल्हापुरात आले होते.

‘खावटी’ कर्ज माफ करणारे कृषिमंत्री

गणपतराव देशमुख यांचे आयुष्यच कष्टकऱ्यांच्या लढ्यासाठी गेले. ज्या-ज्या वेळी सत्तेची संधी मिळाली, त्या-त्या वेळी त्यांनी उठावदार काम केले. १९७८ ला ते कृषिमंत्री असताना विकास संस्थांच्या पातळीवर शेतकऱ्यांनी उचल केलेल्या १५३ कोटींचे खावटी कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.

-----------

शेकापचा विचार व्यक्तीरूपाने त्यांच्यामध्ये होता. हा विचार कशा पद्धतीने अमलात येतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख होते. राजकारणात पदे मिळविण्यास विचार व तत्त्वज्ञान गहाण ठेवून कधी काही केले नाही. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतही ते आले असते. मात्र, तत्त्वज्ञान सोडून काही केले नाही, अशी माणसे फार दुर्मीळ होत आहेत. त्याच वाटेने जाण्याचा प्रयत्न आम्ही केला.

- संपतराव पवार

माजी आमदार शेकाप, कोल्हापूर