शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

आबिटकरांना सभासदच मतपेटीमधून उत्तर देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर देतील. सभासद अपात्र करून त्यांची साखर बंद करणाºया लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर देतील. सभासद अपात्र करून त्यांची साखर बंद करणाºया लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा घणाघाती आरोप करीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी आबिटकर यांचा समाचार घेतला.अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संपर्क दौºयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे माजी संचालक दिनकर पाटील होते. राधानगरीतील पालकरवाडी, कसबा वाळवे, चंद्रे, शेळेवाडी, माजगाव, तळाशी, अर्जुनवाडा, तिटवे या गावांचा सत्तारूढ के. पी. पाटील गटाने संपर्क दौरा केला.पाटील म्हणाले, ज्या कारखान्याचा ऊस दर राज्यात प्रथम क्रमांकावर नेला, आमच्या संचालक मंडळाने सहवीज प्रकल्प यशस्वी करून दाखविला. तो कसा बंद पडेल याचसाठी आटोकाट प्रयत्न करता मग तुम्ही सभासद हिताचे काय निर्णय घेणार? असा सवाल करीत १९९८ साली एक गुंठा जमीन नावावर नसणाºया आबिटकर यांना सभासद केले त्यावेळी आम्ही बरे होतो, मग तुमच्या आज पोटात का दुखते?राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बाजार समितीचे संचालक नेताजीराव पाटील, ‘बिद्री’चे माजी संचालक भिकाजी एकल, पंडित केणे, जि. प. सदस्य जीवन पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, युवराज वारके, मधुआप्पा देसाई, शरद पाटील, शहाजी बरगे, उमेश भोईटे, नानासो पाटील, आप्पासो देसाई, आप्पासो आबदार, अशोकराव फराकटे, सुनील वारके, पंडित पाटील, आदी उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. दिनेश माळे यांनी आभार मानले.सभासद अपात्र करून तुम्ही काय साधले?बिद्री साखर कारखान्याला सभासद करताना आम्ही कधीही गटातटाचा विचार केला नाही, सहवीज प्रकल्प यशस्वी व्हावी हा एकच उद्देश होता. मात्र, आमदार आबिटकर आणि मंडळींनी शेतकºयांचा विश्वासघात केला. जो शेतकरी आहे, ऊस पिकवितो, कार्यक्षेत्रातील आहे, त्याला अपात्र करून तुम्ही काय साधले? असा सवाल माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. माझे पाहुणे निगवे येथे जमीन कसतात, आमदार मुश्रीफ यांचे चिरंजीव बोरवडे गावचे खातेदार आहेत त्यांचा ऊस ‘बिद्री’ला येतो मग हे कार्यक्षेत्रातले नव्हेत का ? सोशल मीडियावरून दिशाभूल करू नका, या निवडणुकीत उद्या तुम्हीच अपात्र होणार आहात, असे पाटील म्हणताच उपस्थित सभासद शेतकºयांनी दाद दिली.