शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

आबिटकरांना सभासदच मतपेटीमधून उत्तर देतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर देतील. सभासद अपात्र करून त्यांची साखर बंद करणाºया लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा ...

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघाच्या विकासापेक्षा बिद्री कारखान्याचे वाढीव सभासद कसे अपात्र होतील यावरच अधिक भर दिला. आमदारकीच्या तीन वर्षांत त्यांनी हाच एककलमी उद्योग केला. मात्र, आता मतपेटीतून सभासदच त्याचे उत्तर देतील. सभासद अपात्र करून त्यांची साखर बंद करणाºया लोकांना मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही, असा घणाघाती आरोप करीत माजी आमदार के. पी. पाटील यांनी आबिटकर यांचा समाचार घेतला.अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे बिद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संपर्क दौºयात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे माजी संचालक दिनकर पाटील होते. राधानगरीतील पालकरवाडी, कसबा वाळवे, चंद्रे, शेळेवाडी, माजगाव, तळाशी, अर्जुनवाडा, तिटवे या गावांचा सत्तारूढ के. पी. पाटील गटाने संपर्क दौरा केला.पाटील म्हणाले, ज्या कारखान्याचा ऊस दर राज्यात प्रथम क्रमांकावर नेला, आमच्या संचालक मंडळाने सहवीज प्रकल्प यशस्वी करून दाखविला. तो कसा बंद पडेल याचसाठी आटोकाट प्रयत्न करता मग तुम्ही सभासद हिताचे काय निर्णय घेणार? असा सवाल करीत १९९८ साली एक गुंठा जमीन नावावर नसणाºया आबिटकर यांना सभासद केले त्यावेळी आम्ही बरे होतो, मग तुमच्या आज पोटात का दुखते?राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, बाजार समितीचे संचालक नेताजीराव पाटील, ‘बिद्री’चे माजी संचालक भिकाजी एकल, पंडित केणे, जि. प. सदस्य जीवन पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, युवराज वारके, मधुआप्पा देसाई, शरद पाटील, शहाजी बरगे, उमेश भोईटे, नानासो पाटील, आप्पासो देसाई, आप्पासो आबदार, अशोकराव फराकटे, सुनील वारके, पंडित पाटील, आदी उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी स्वागत केले. दिनेश माळे यांनी आभार मानले.सभासद अपात्र करून तुम्ही काय साधले?बिद्री साखर कारखान्याला सभासद करताना आम्ही कधीही गटातटाचा विचार केला नाही, सहवीज प्रकल्प यशस्वी व्हावी हा एकच उद्देश होता. मात्र, आमदार आबिटकर आणि मंडळींनी शेतकºयांचा विश्वासघात केला. जो शेतकरी आहे, ऊस पिकवितो, कार्यक्षेत्रातील आहे, त्याला अपात्र करून तुम्ही काय साधले? असा सवाल माजी आमदार के. पी. पाटील यांनी केला. माझे पाहुणे निगवे येथे जमीन कसतात, आमदार मुश्रीफ यांचे चिरंजीव बोरवडे गावचे खातेदार आहेत त्यांचा ऊस ‘बिद्री’ला येतो मग हे कार्यक्षेत्रातले नव्हेत का ? सोशल मीडियावरून दिशाभूल करू नका, या निवडणुकीत उद्या तुम्हीच अपात्र होणार आहात, असे पाटील म्हणताच उपस्थित सभासद शेतकºयांनी दाद दिली.