शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

‘स्वाभिमानी’चे सदस्य सहलीपासून अलिप्त

By admin | Updated: December 22, 2015 00:50 IST

उमेदवारांकडून पाठलाग : राजू शेट्टी यांच्या आदेशानुसारच निर्णय

कोल्हापूर : विधान परिषद निवडणुकीतील चुरशीमुळे बहुतांश जिल्हा परिषद सदस्य सहलीवर गेले आहेत. मात्र, अजून तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाच सदस्य आणि एक सभापती सहल आणि विविध आमिषांपासून दूर राहत कोल्हापूर जिल्ह्यातच आहेत. सोमवारी ‘स्वाभिमानी’चे सहाजण येथील जिल्हा परिषदेत येऊन नियमित कामकाज पाहिले. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री सतेज पाटील आणि विद्यमान आमदार महादेवराव महाडिक विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत. त्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक मतदाराला ‘सोन्याचा भाव’ आला आहे. मतदारांच्या हाता-पाया पडण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. अनेक मतदार ‘टोकन’ घेऊनच सहलीवर गेल्याची चर्चा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंब्याचा अधिकृत निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार ‘स्वाभिमानी’च्या सदस्यांच्या संपर्कात आहेत. सहलीची आॅफर दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपासून ‘स्वाभिमानी’चे सदस्यही जम्मू-काश्मीर, केरळ येथे सहलीला गेल्याची चर्चा जोरात सुरू होती. जाहीरपणे भूमिका न घेता सहलीवर कसे गेले, अशीही विचारणा होत होती.‘स्वाभिमानी’चे जिल्हा परिषद सदस्य सुरेश कांबळे, नीता परीट, अनिल मादनाईक, सुनंदा दानोळे, सीमा पाटील, सभापती शीला पाटील सोमवारी जिल्हा परिषदेत आले होते. त्यामुळे ‘स्वाभिमानी’चे सदस्य सहलीला गेले आहेत या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, पाठींब्यासाठी दोन्ही उमेदवार पाठलाग करीत या सहा सदस्यांशी थेट संपर्क साधून आपल्यालाच मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. (प्रतिनिधी)स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाला पाठिंबा देणार याचा निर्णय अद्याप झालेला नसून तो खासदार राजू शेट्टी घेणार आहेत. ‘स्वाभिमानी’चे कोणीही सहलीवर गेलेले नसून ‘स्वाभिमाना’ने ते आपल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. शेट्टी दिल्लीहून आल्यानंतर निर्णय होईल. मतदानादिवशी स्वतंत्रपणे येवून ते मतदानाचा हक्क बजावतील.- भगवान काटे, जिल्हा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना