शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

हातकणंगले ग्रामसभेत सदस्यांची झाडाझडती

By admin | Updated: January 29, 2015 00:09 IST

गैैरव्यवहाराचा मुद्दा चर्चेत : खोट्या सह्या करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याचा ठराव

आळते : अनेक दिवसांपासून चालू असलेल्या हातकणंगले ग्रामपंचायतीच्या गैरकारभारावर ग्रामस्थांनी ग्रामसभेत प्रश्नांचा भडिमार करून प्रशासन व लोकप्रतिनिधींना निरुत्तर केले. मागील ग्रामसभेला अनुपस्थित राहून नंतर खोट्या सह्या करणाऱ्या तेरा ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यपद रद्द करण्याच्या ठरावासह ग्रामविकास अधिकारी राहुल सिदनाळे यांच्या बदलीचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री अपराज होत्या.हातकणंगले ग्रामपंचायतीमध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने चाललेल्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये अनेक दिवसांपासून संताप खदखदत होता. त्यामुळे २६ जानेवारीच्या ग्रामसभेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. ही सभा वादळी होण्याचे संकेत लोकप्रतिनिधी व प्रशासनाला समजल्याने सरपंच जयश्री अपराज यांचा ग्रामसभा गुंडाळण्याचा डाव नागरिकांनी हाणून पाडला. सरपंच अपराज यांनी गणसंख्येअभावी ग्रामसभा तहकूब करीत असल्याचे सांगताच संतप्त नागरिकांनी प्रश्नांचा भडिमार करत सह्या घेण्याची मागणी केली. नागरिकांची गर्दी पाहून ग्रामपंचायत सभागृहातील सभा बाजारपेठेतील नेहरू चौकात घेण्यात आली.मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून दाखवित असताना ग्रामविकास अधिकारी सिदनाळे यांनी मागील ग्रामसभेला फक्त चार ग्रामपंचायत सदस्य उपस्थित असताना सर्वच सदस्य उपस्थित असल्याचे सांगताच आण्णासोा चौगुले यांनी आक्षेप घेत केवळ चारच सदस्य उपस्थित असल्याचे सांगून सदस्यांच्या नंतर खोट्या सह्या घेतल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामविकास अधिकारी चुकीची माहिती देत असल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच सभेत एकच गोंधळ उडाला. खोट्या सह्या करून नागरिकांची आणि शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरा ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव यावेळी बहुमताने मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकप्रतिनिधींशिवाय अन्य कारभारी मंडळीची लुडबूड चालू असल्याने त्याचा त्रास काही ग्रामपंचायत सदस्यांना व नागरिकांना होत असल्याने कामकाजातील इतरांची ढवळाढवळ बंद करण्याचा ठराव संमत झाला. गावातील सर्वच पाणी कनेक्शन स्टॉप व्हॉल्व्ह बसवावे, घरफाळा व पाणीपट्टीत कोणतीही वाढ करू नये, शेतकऱ्यांना चोवीस तास वीजपुरवठा व्हावा, ग्रामसंस्कार वाहिनी दुरुस्त करून त्याचा वापर करावा, बेघर वसाहतीतील घरे भाड्याने देणाऱ्या किंवा विकणाऱ्या लाभार्थींवर कारवाई करावी, आदींसह अनेक ठराव मंजूर झाले. (वार्ताहर)'ग्रामस्थांच्या प्रश्नांना सदस्यांचे मौननागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सरपंच, काही सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांची भंबेरी उडाल्याने त्यांना बहुतांश प्रश्नांना उत्तरे देण्यास आली नाहीत. तर काही सदस्यांनी मौन धारण केले होते. हातकणंगले गावच्या इतिहासात प्रथमच वादळी ग्रामसभा होऊन कामकाज चव्हाट्यावर आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत असले, तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी पारदर्शक कारभार करण्याची मागणी मात्र नागरिकांतून होत आहे.