शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

मायणीच्या खेळाडूचा केरळमध्ये मृत्यू

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

मयुरेशचा मृतदेह मंगळवारी गावात : नेटबॉल सामन्यानंतर बीचवर दुर्घटना

सातारा : ‘स्पोर्टस इज लाईफ’ असं वाक्य खेळाडूंच्या तोंडी नेहमीच पाहायला मिळतं. मात्र, क्रीडा नैपुण्याच्या शिखरावर असताना ‘लाईफ ल्ााईन’ तुटण्याचा दुर्दैवी प्रकार मायणी (ता. खटाव) येथील मयुरेश भगवान पवार (वय २0) या खेळाडूच्याबाबतीत घडला. केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेतील येथील बिचवर त्याचा मृत्यू ाला. सुरुवातीला ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत होते, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर पाण्यात बुडून मयुरेशचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या या चटका लावणाऱ्या मृत्यूमुळे अवघे मायणी गाव स्तब्ध झाले आहे.त्रिवेंद्रम (केरळ) येथील अ‍ॅग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील ‘महाराष्ट्र विरुद्ध चंदीगढ’ हा सामना सोमवारी (दि.२) दुपारी १२ वाजता होता. संपूर्ण स्पर्धेत आपल्या चपळतेचं दर्शन घडविणाऱ्या मयुरेशच्या नेत्रदीपक खेळाचं दर्शन याही स्पर्धेत पाहायला मिळालं. सामन्यानंतर मयुरेशसह महाराष्ट्र संघातील मायणीच्या खेळाडूचा केरळमध्ये मृत्यू इतर खेळाडू बीचवर फिरायला गेले होते. त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.मयुरेश हा अत्यंत हरहुन्नरी खेळाडू. मायणी या त्याच्या गावापासूनच त्याने नेटबॉल खेळात चमक दाखविली. त्याचे प्रशिक्षक श्रीमंत कोकरे यांनी त्याच्यातील चमक ओळखून त्याला शालेय संघात घेतले. मायणीतल्या भारतमाता विद्यालयात त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. पुढे तो साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सायन्समध्ये दाखल झाला. ११ वी व १२ वी सुरू असतानाच त्याने नेटबॉलचाही सराव सुरू ठेवला. यानंतर पुण्यातील काशीबाई नवले इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतला. सध्या तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. सातारा येथील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेतून मयुरेशची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. मयुरेश सलग आठ-नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळला आहे. त्याचे वडील मायणी अर्बन बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहेत. धाकटा भाऊ आकाश याचे विटा, ता. खानापूर येथील डिप्लोमाचे शिक्षण सुरूआहे. राज्य संघातून निवडमायणी : महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनतर्फे महाराष्ट्राच्या संघातून मायणीतील मयुरेश पवार व गणेश चौधरी या दोन नेटबॉल खेळाडूंची निवड झाली होती. मयुरेशचा नागपूर येथे २२ ते ३० जानेवारीपर्यंत सराव शिबीर झाले. त्यानंतर दि. ३० व ३१ जानेवारी रोजी इंजिनिअरिंगचा त्याने पेपर दिला. दि. ३१ रोजी तो केरळला गेला होता. मयुरेशचे पार्थिव मंगळवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. तिथून ते वाहनाने मायणीत आणले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.