शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘भोगावती’मध्ये मेगा नोकरभरती !

By admin | Updated: November 18, 2015 00:01 IST

काही संचालक ठाम : बरेचसे नेत्यांवर अवलंबून

राजेंद्र पाटील -- भोगावती --येथील भोगावती साखर कारखान्यात विविध कारणांनी गाजत असलेल्या नोकरभरतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नोकरभरती करायचीच यावर काही संचालक ठाम आहेत. त्यामुळे मेगा भरती होणार हे निश्चित आहे.भोगावती कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे सर्वश्रृत आहे. कामगारांना पगार देण्यास कारखान्याकडे पैसा नाही. आठ महिन्यांची सभासद साखर देणे आहेत. अशा परिस्थितीत भरती होत आहे. कारखान्याकडे सध्या ४00 कायम कामगार आहेत. त्यामध्ये आता १0४ कायम कामगारांची भरती केली जाणार आहे. ५0 रोजंदारी कामगार घेतले जाणार असून १५0 पेक्षा जादा कामगारांना निश्चित वेतनावर घेतले जाणार आहे. काही संचालकांनी यापूर्वीच तीन-चार अशा प्रमाणात जागा भरल्या आहेत. आता कार्यकर्त्यांचा तगादा असल्यामुळे जादा जागांची मागणी करू लागले आहेत. यातून नाराजीदेखील उमटू लागली आहे.कारखान्यात पूर्वी काम करत असलेल्या अनेक रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्याप कायम केले नाही. मात्र नवीन भरतीचा घाट घातला जात आहे. यात इच्छुकांची संख्या पाहता सर्वांचे समाधान या नोकरभरतीत होऊ शकत नाही. तरीही काही संचालक नोकरभरतीवर ठाम आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी या नोकरभरतीला तीव्र विरोध केला आहे. तरीही त्यांच्या आदेशाला संचालकांनी केराची टोपली दाखविली.गेल्या गळीत हंगामात ज्यांनी रोजंदारीवर काम केले त्यांना हजेरीतील दमडीही अद्याप दिलेली नाही. याबाबत संचालक बोलायला तयार नाहीत.भोगावती कारखान्यात कामगार पॅटर्न ९५0 कर्मचाऱ्यांचा आहे. सध्या ३९३ कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या ठिकाणी कामगार नियुक्त करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे पूर्वीपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा विचार आहे. याबाबत अद्याप एकमत झालेले नाही. - एस. एस. पाटील, कार्यकारी संचालक, भोगावती कारखाना.सहसंचालकांच्या आदेशाचे काय ?भोगावती साखर कारखान्याच्या प्रस्तावित निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही स्वरूपात कोणत्याही संवर्गात कायमस्वरुपी, अंशकालीन अथवा रोजंदारी स्वरूपाची नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येऊ नये, असा आदेश प्रादेशिक सहसंचालकांनी दिला असतानाही नोकरीभरतीची प्रक्रिया सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. साखर सहसंचालकांचा आदेश डावलून केलेली नोकरभरती वैध ठरणार की आदेश डावलल्याने साखर आयुक्त ‘भोगावती’वर कायद्याचा बडगा उगारणार, हा प्रश्न निर्माण झाला असून, नोकरी मिळणार या आशेने पाच वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.