शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

ऊसदराबाबत साखर संघात गुरुवारी बैठक

By admin | Updated: November 14, 2015 01:15 IST

चंद्रकांत पाटील : ‘एफआरपी’चा तिढा सुटणार

कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’वरून राज्यात साखर उद्योगासमोर निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी गुरुवारी (दि. १९) साखर संघात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यंदाच्या हंगामात एकरकमी एफआरपीवरून पेच निर्माण झाला आहे. साखरेचे बाजारातील दर व बॅँकांची उचल पाहता एकरकमी पैसे देणे अशक्य असल्याची भूमिका कारखानदारांनी घेतल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद घेऊन आंदोलनाचा एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला होता; पण ऊस परिषदेच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना फोन करून अधिक आक्रमक न होता, पहिल्यांदा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा करावी असे सूचविले व त्याबाबत लवकरच बैठक घेण्याची सूचना त्यांनी सहकार विभागाला दिली होती. त्यानुसार १९ नोव्हेंबरला साखर संघात चंद्रकांतदादा पाटील यांनी ही बैठक बोलावली आहे. साखर कारखानदार, संघटनांचे प्रतिनिधी, उपस्थित राहणार आहेत.  

शेतकरी संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार १९ नोव्हेंबरला साखर संघाच्या कार्यालयात बैठक होत आहे. यामध्ये सर्व घटकांशी चर्चा करून चांगला निर्णय घेतला जाईल. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनेच राहील व एकरकमी एफआरपीवर ठाम आहे. - चंद्रकांतदादा पाटील (सहकारमंत्री)