शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

अतिवरिष्ठ २५ अधिकारी घेणार जिल्ह्यात बैठका- महाराष्ट्रात अशा पहिल्यांदाच जिल्हास्तरावर बैठकां

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:39 IST

तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुका आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आखलेल्या योजनांची फलनिष्पत्ती दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून बहुतांश

ठळक मुद्देसहा महिन्यांत योजनांची फलनिष्पत्ती साध्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देशबुधवारपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका

समीर देशपांडेकोल्हापूर : तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुका आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आखलेल्या योजनांची फलनिष्पत्ती दाखविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून बहुतांश मंत्रालयात कार्यरत असणारे अतिवरिष्ठ २५ अधिकारी आता आज, बुधवारपासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने गेल्या चार वर्षांमध्ये जेवढ्या योजना जाहीर केल्या त्यातून नेमके काय साध्य झाले, याची पाहणी करण्यासाठी आता हे अधिकारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही बैठक घेणार आहेत. यामध्ये विविध खात्यांचे अप्पर मुख्य सचिव, सचिव, सदस्य सचिव, प्रधान सचिव, महासंचालक, आयुक्त अशा अतिवरिष्ठ अधिकाºयांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे पहिल्यांदाच जिल्हास्तरावर बैठकांचे आयोजन होत आहे.

यासाठी सहा समित्या तयार करण्यात आल्या असून त्यांच्याकडे विविध जिल्ह्यांचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख १0 योजनांचा तीन तासांमध्ये तर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा पोलीस ठाणेनिहाय दोन तासांमध्ये आढावा घेणे या अधिकाºयांना बंधनकारक करण्यात आले आहे.

योजनांसाठी त्या-त्या जिल्ह्याने केलेली अतिरिक्त निधीची मागणी, तिची पूर्तता, योजनांशी संबंधित रिक्त जागा भरण्याची कार्यवाही, जलसिंचन प्रकल्पांच्या सुधारित मान्यतांची सद्य:स्थिती, पुनर्वसनासाठी अतिरिक्त निधीची उपलब्धता आणि धोरण, नियमांच्या शिथिलीकरणाबाबतची सद्य:स्थिती याचा आढावा या बैठकांमध्ये घेण्यात येणार आहे.या दहा योजनांचा आढावा बंधनकारकप्रधानमंत्री ग्रामीण, शहरी आवास, जलयुक्त शिवार, महानरेगा, धडक विहिरी, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुद्रा, मुख्यमंत्री ग्रामसडक, दलितवस्ती सुधार, बळिराजा, पंतप्रधान कृषिसिंचन योजना आणि प्रत्येक जिल्ह्यातील पाणीपुरवठा, भूमिगत गटार, मलनि:सारण योजनेतील दोन पथदर्शक प्रकल्प याबाबतचा आढावा हे अधिकारी घेणार आहेत.पोलीस ठाणेनिहाय चर्चाजिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत दोन तास बैठक घेण्यात येणार असून प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय गुन्हे सिद्धीचे प्रमाण, महिला अत्याचारासंबंधी गुन्ह्यांची संख्या, नोंद झालेले गुन्हे, तपास पूर्ण व अपूर्ण गुन्हे यांचा आढावा घेण्यात येणार आहे.अधिकाºयांची धावपळराज्यपातळीवरील अतिवरिष्ठ अधिकारी जिल्हापातळीवर आढावा घेण्यासाठी येत असल्याने अधिकाºयांची धावपळ उडाली आहे. ही सर्व आकडेवारी घेऊन थेट मुख्यमंत्र्यांसमोर तिचे सादरीकरण होणार असल्याने याबाबतचे नियोजन करण्यासाठी सर्वजण कार्यरत झाले आहेत.

टॅग्स :Governmentसरकारgovernment schemeसरकारी योजना