शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सभा सप्टेंबरपर्यंत; लेखापरीक्षणास मात्र डिसेंबरपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:30 IST

कोल्हापूर : सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण पूर्ण करून ताळेबंद निश्चित करून सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सभासदांसमोर मांडणे अपेक्षित असते. मात्र, राज्य ...

कोल्हापूर : सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण पूर्ण करून ताळेबंद निश्चित करून सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सभासदांसमोर मांडणे अपेक्षित असते. मात्र, राज्य सरकारने लेखापरीक्षणास डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देत असताना संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभामात्र सप्टेंबरपर्यंत घेण्याचा फतवा काढला आहे. त्यामुळे अनेक संस्थांना लेखापरीक्षणाविनाच सभा घ्याव्या लागणार असल्याने संस्थाचालकांमध्ये संभ्रमावस्था पसरली आहे.

केंद्र सरकारच्या घटनादुरुस्तीपूर्वी ऑगस्टपर्यंत सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक होते. मात्र, ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर त्यात बदल झाला. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षातील लेखापरीक्षण जुलैपर्यंत पूर्ण करून ऑगस्ट मध्ये सहकार विभागाला मेमो (अहवाल) सादर करायचा असतो. लेखापरीक्षणातील दोषदुरुस्ती करून परिपूर्ण ताळेबंद घेऊन सप्टेंबरपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे संस्थांना बंधनकारक आहे.

मात्र, २०२० पासून कोरोनामुळे सहकारी संस्थांचे वेळापत्रकच कोलमडले आहे. मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सहकारी संस्थांना डिसेंबरअखेर लेखापरीक्षण, तर मार्चअखेर कधीही सभा घेण्यास परवानगी दिली होती. जिल्हा व तालुकास्तरीय संस्थांनी ऑनलाईन सभा घेतल्या, मात्र गाव व वाड्या-वस्त्यांवरील संस्थांकडे अद्ययावत सुविधा नसल्याने सभा घ्यायच्या कशा? असा पेच होता. मध्यंतरी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून राज्य सरकारने संस्थांना डिसेंबरपर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची मुभा दिली हाेती. त्यामुळे संस्था पातळीवर संथगतीने काम सुरू होते. तोपर्यंत सप्टेंबरपर्यंत सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश दिले, मात्र लेखापरीक्षण डिसेंबर २०२१ पर्यंत करण्याची मुभा दिली आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे लेखापरीक्षणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. लेखापरीक्षण पूर्ण नसताना सभा घेऊन सभासदांसमोर ताळेबंद मांडायचा तरी कसा, असा प्रश्न संस्थाचालकांसमोर आहे.

कोरोनाच्या आडून संस्थांचा खेळखंडोबा

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सहकारी संस्थांच्या निवडणुका नाहीत. त्यामुळे संस्थातंर्गत वाद उफाळलेले आहेत. त्यातच वार्षिक सर्वसाधारण सभा व लेखापरीक्षणाच्या मुदतीचा गोंधळ सुरू आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या आडून संस्थांचा खेळखंडोबा सुरू केल्याच्या संतप्त भावना संस्थाचालकांमधून व्यक्त होत आहेत.

कोट-

बहुतांशी संस्थांचे लेखापरीक्षण पूर्ण नसल्याने सप्टेंबरपर्यंत सभांच्या दिलेल्या मुदतीमुळे संस्था पातळीवर गोंधळ आहे. यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे लेखापरीक्षणास डिसेंबरअखेर व सभांना मार्चपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे केली आहे.

- शंकर पाटील (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन)