शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

विद्यापीठाच्या सांगलीतील उपकेंद्राबाबत मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:37 IST

सांगली जिल्ह्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्यासाठी येथील जागा पाहणीदेखील विद्यापीठाच्या समितीने करून ...

सांगली जिल्ह्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले. त्यासाठी येथील जागा पाहणीदेखील विद्यापीठाच्या समितीने करून त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विद्यापीठ हे उपकेंद्र अन्यत्र करण्याचा घाट घालत आहे का?, अशी शंका तालुक्यातील विद्यार्थी, नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. उपकेंद्र खानापूर येथे झाल्यास आसपासच्या आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, कडेगाव आदी सर्व तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी ते सोयीस्कर ठरणार आहे. भौगोलिकदृष्ट्या आणि आवश्यक त्या सोयी-सुविधांच्यादृष्टीने खानापूरमधील उपलब्ध जागा योग्य असल्याने त्याच ठिकाणी उपकेंद्र व्हावे. याबाबत पुढील कार्यवाहीचा निर्णय घेण्यापूर्वी अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करावी, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ‘किसान सभे’चे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, संघटक गोपीनाथ सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सुनील हसबे, सदस्य दौलत भगत, विकास देसाई, युवराज भगत, नानासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.