शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

हद्दवाढीसाठी मंत्रालय स्तरावर बैठक घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महानगरपालिकेची हद्दवाढ रखडल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे हद्दवाढी संदर्भात मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घ्यावी, अशी ...

कोल्हापूर : महानगरपालिकेची हद्दवाढ रखडल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे हद्दवाढी संदर्भात मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घ्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोल्हापूर महानगरपालिका सर्वात लहान क्षेत्रफळ असणारी एकमेव महानगरपालिका आहे. महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी ही कित्येक वर्षांची मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने झाली आहेत. मी सन २०१६ मध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर आमरण उपोषण केले. त्यावेळी काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे प्राधिकरण मंजूर करण्यात आले. परंतु, प्राधिकरणाचे काम पूर्णत: ठप्प असल्याने शहराचा विकास खुंटला आहे, यासह नागरिकांसमोर बांधकाम परवान्या सारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वास्तविक पाहता शहराची हद्दवाढ ही विकासाच्या दृष्टीने नैसर्गिक प्रक्रिया आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक या शहरांची हद्दवाढ अनेकवेळा झाल्याने ही शहरे विकासाच्या दृष्टीने वाटचाल करीत आहेत. पुणे महानगरपालिकेची तब्बल १२ वेळा हद्दवाढ करण्यात आली आहे. परंतु कोल्हापूर शहर हद्दवाढीअभावी भकास होत चालले आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

शहराची हद्दवाढ झाली तर नक्कीच महानगरपालिकेचे आर्थिक उत्पनात वाढ होऊन शहराचा विकास साधता येणार आहे. यासह केंद्र व राज्य शासनाच्या लोकसंखेच्या आधारावरील सर्व विकासकामांना निधी मिळू शकणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनास दिल्या होत्या. यावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने कोणती कार्यवाही केली, याचा आढावा घेण्याकरिता मंत्रालय स्तरावर संबधित सर्व अधिकारी यांचे समवेत तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.