शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

राजाराम महाविद्यालयाच्या प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

By admin | Updated: July 6, 2015 00:31 IST

रवींद्र वायकर : राजारामपुरीतील नागरिकांना आश्वासन

कोल्हापूर : राजाराम महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसह इतर प्रश्नांबाबत मुंबईत लवकरच बैठक बोलावू, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी शिष्टमंडळाला दिली. राजारामपुरी परिसर तालीम संस्था, तरुण मंडळ व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने रविवारी शासकीय विश्रामगृह येथे वायकर यांची भेट घेऊन महाविद्यालयात प्रश्नांबाबत निवेदन दिले. राजाराम महाविद्यालय हे १३५ वर्षांचे जुने आहे. महाविद्यालयाची गुणवत्ता व शिस्त पाहता गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रवेशासाठी खूप गर्दी होत आहे; पण येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. इमारतीची कमतरता आहे, चार इमारती आहेत; पण त्यापैकी दोन अर्धवट आहेत. इमारतीचे मूळ अंदाजपत्रक ८.४४ कोटींचे असताना केवळ २.६८ कोटी रुपये प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे इमारतीचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. महाविद्यालयास ‘नॅक’चे मानांकन मिळण्यासाठी काही सुविधांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याची पूर्तता करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. राजारामपुरी परिसरातील विद्यार्थ्यांना १० टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. यावर बोलताना राज्यमंत्री वायकर म्हणाले, परिसरातील महाविद्यालय म्हणून प्रवेशाबाबत दुजाभाव करता येणार नाही. महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुंबईत बैठक घेऊ. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, नगरसेविका संगीता देवेकर, प्रा. अनिल घाटगे, नितीन पाटील, अनिल कदम, साजीद खान, फिरोज सौदागर, नामदेव नलवडे, संजय काटकर, रवींद्र देसाई, विशाल पाटील, नितीन मोरे, चंद्रकांत दिंडे, आदी उपस्थित होते.