शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

१४ जानेवारीस मुंबईत बैठक

By admin | Updated: January 4, 2015 01:20 IST

टोलप्रश्न : पर्यायांवर होणार चर्चा; त्यानंतर होणार फेरमूल्यांकन

 कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वादग्रस्त टोलप्रश्नी रस्त्याच्या मूल्यांकनासाठी नव्या सरकारने नियुक्त केलेल्या समितीची बैठक येत्या १४ जानेवारीस मुंबईत होत आहे. या समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह समितीचे सदस्य बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मुख्यत: पर्यायांवर चर्चा अपेक्षित असून, त्यानंतर ही समिती प्रत्यक्ष कोल्हापुरात येऊन प्रकल्पाचे फेरमूल्यांकन करणार आहे. आयआरबी कंपनीने केलेल्या ४९.४९ किलोमीटर रस्त्यांच्या खर्चाचे पुन्हा मूल्यांकन करण्याचा तसेच या मूल्यांकनासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २४ डिसेंबरच्या बैठकीत झाला. या समितीची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे त्यावेळी जाहीर झाले होते. त्यामुळे ही बैठक कधी होणार याची विचारणा ‘लोकमत’ने आज रस्ते विकास महामंडळाच्या सूत्रांकडे केली. त्यांनी १४ जानेवारीला बैठक होत असल्याचे स्पष्ट केले. ही समिती शहरातील रस्त्यांचे फेरमूल्यांकन करणार आहे. मूल्यांकनानंतर ‘आयआरबी’ची व्याजासह होणारी रक्कम कोणी व कशी द्यायची याबाबतचे पर्याय समितीने सूचवायचे आहेत. आयआरबीच्या रस्त्यांचे मूल्यांकन यापूर्वी कॉँग्रेस आघाडी सरकारने केले होते. त्याकरिता तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने मूल्यांकन नेमके किती केले, हे काही बाहेर आलेच नाही. नंतर रक्कम देण्याच्या पर्यायावर घोडे नडले. जनतेच्या मनातील निर्णय : मुख्यमंत्री आज, शनिवारी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार टोलप्रश्नी पर्यायांचा अभ्यास करणार असल्याचा पुनरुच्चार केला. टोलप्रश्नी कोल्हापूरच्या जनतेच्या मनात आहे, तसाच निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.