शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘दमसा’चे संमेलन ९ जानेवारीपासून

By admin | Updated: December 29, 2015 00:39 IST

साहित्य, कलांवर चर्चा : दोन दिवसांमध्ये परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखत

कोल्हापूर : साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांचे न राहता चित्रकला, शिल्पकला या कलांचे सादरीकरण संमेलनस्थळी केले जाणार आहे. यंदाच्या संमेलनात साहित्य व कला या क्षेत्रातील विचारांची देवाण-घेवाण व ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी सोमवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलन दि. ९ जानेवारीपासून राजाराम महाविद्यालयाचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि आवारात संमेलनानिमित्त उभारलेल्या ‘राजर्षी शाहू नगरी’ येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता हिंदी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनाचे उद्घाटन करणार आहेत. प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ‘नॅक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील उपस्थित असणार आहेतसंमेलनाच्या आदल्या दिवशी (दि. ८) दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर व परिसरातील शालेय मुलांचा सहभाग त्यामध्ये असणार आहे, तसेच सीमाभागातील साहित्य संमेलन दिंडी, शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील साहित्यदिंडी, डोंगरी साहित्यदिंडी, शब्दांगण ग्रंथदिंडी, सह्याद्री साहित्य संमेलन दिंडी अशा पाच ठिकाणांहून येणाऱ्या ग्रंथदिंडी संमेलनात सहभागी होतील. दि. ९ व १० डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या संमेलनात पहिल्या दिवशी दुपारी १२.३० वाजता ‘कथाकथन’, दुपारी ३ वाजता ‘मराठीचे भवितव्य आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद, दुपारी ३.३० वाजता ‘कविकट्टा प्रारंभ’, सायंकाळी ५ वाचता ‘शब्दसुरांच्या झुल्यावर- कोल्हापूरची कविता’, ‘स्वरनिनाद’तर्फे कोल्हापूरच्या कवींच्या कवितांचा स्वरबद्ध आविष्कार, रात्री ८.३० वाजता ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ हे कार्यक्रम होतील.१० डिसेंबरला सकाळी ‘चित्र-शिल्प-काव्य’ या कार्यक्रमात व्यासपीठावर एकाचवेळी चित्रकला, शिल्पकलेचे नमुने व कविता सादर केल्या जाणार आहेत. सकाळी ११.३० वाजता ‘शाळकरी मुलांचा साहित्य आविष्कार’, दुपारी १२.३० वाजता ‘कादंबरीकार श्याम मनोहर यांची प्रकट मुलाखत’, दुपारी ३ वाजता ‘महाराष्ट्र सहिष्णू आहे का’ या विषयावर परिसंवाद व महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या बाळ यांचा सत्कार, सायंकाळी ५ वाजता ‘समारोप’ हे कार्यक्रम होतील. या संमेलनाला विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी यांच्याशी वाचकांचा संवाद होण्यास मदत होईल. यावेळी ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे, दळवीज आर्टस्चे अजेय दळवी, व्ही. बी. पाटील, कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे प्रशांत जाधव, ‘रंगबहार’चे विजय टिपुगडे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह गोविंद पाटील, डॉ. विनोद कांबळे, आदी उपस्थित होते.