शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

‘दमसा’चे संमेलन ९ जानेवारीपासून

By admin | Updated: December 29, 2015 00:39 IST

साहित्य, कलांवर चर्चा : दोन दिवसांमध्ये परिसंवाद, कविसंमेलन, मुलाखत

कोल्हापूर : साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिकांचे न राहता चित्रकला, शिल्पकला या कलांचे सादरीकरण संमेलनस्थळी केले जाणार आहे. यंदाच्या संमेलनात साहित्य व कला या क्षेत्रातील विचारांची देवाण-घेवाण व ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे अध्यक्ष विजय चोरमारे यांनी सोमवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पत्रकार परिषदेत दिली.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे २७ वे साहित्य संमेलन दि. ९ जानेवारीपासून राजाराम महाविद्यालयाचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि आवारात संमेलनानिमित्त उभारलेल्या ‘राजर्षी शाहू नगरी’ येथे होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता हिंदी भाषेतील ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या हस्ते होणार आहे. यापूर्वी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथदालनाचे उद्घाटन करणार आहेत. प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, ‘नॅक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील उपस्थित असणार आहेतसंमेलनाच्या आदल्या दिवशी (दि. ८) दुपारी ३ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर व परिसरातील शालेय मुलांचा सहभाग त्यामध्ये असणार आहे, तसेच सीमाभागातील साहित्य संमेलन दिंडी, शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील साहित्यदिंडी, डोंगरी साहित्यदिंडी, शब्दांगण ग्रंथदिंडी, सह्याद्री साहित्य संमेलन दिंडी अशा पाच ठिकाणांहून येणाऱ्या ग्रंथदिंडी संमेलनात सहभागी होतील. दि. ९ व १० डिसेंबर या कालावधीत चालणाऱ्या या संमेलनात पहिल्या दिवशी दुपारी १२.३० वाजता ‘कथाकथन’, दुपारी ३ वाजता ‘मराठीचे भवितव्य आणि प्रसारमाध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद, दुपारी ३.३० वाजता ‘कविकट्टा प्रारंभ’, सायंकाळी ५ वाचता ‘शब्दसुरांच्या झुल्यावर- कोल्हापूरची कविता’, ‘स्वरनिनाद’तर्फे कोल्हापूरच्या कवींच्या कवितांचा स्वरबद्ध आविष्कार, रात्री ८.३० वाजता ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ हे कार्यक्रम होतील.१० डिसेंबरला सकाळी ‘चित्र-शिल्प-काव्य’ या कार्यक्रमात व्यासपीठावर एकाचवेळी चित्रकला, शिल्पकलेचे नमुने व कविता सादर केल्या जाणार आहेत. सकाळी ११.३० वाजता ‘शाळकरी मुलांचा साहित्य आविष्कार’, दुपारी १२.३० वाजता ‘कादंबरीकार श्याम मनोहर यांची प्रकट मुलाखत’, दुपारी ३ वाजता ‘महाराष्ट्र सहिष्णू आहे का’ या विषयावर परिसंवाद व महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्या बाळ यांचा सत्कार, सायंकाळी ५ वाजता ‘समारोप’ हे कार्यक्रम होतील. या संमेलनाला विचारवंत, साहित्यिक, लेखक, कवी यांच्याशी वाचकांचा संवाद होण्यास मदत होईल. यावेळी ज्येष्ठ लेखक चंद्रकुमार नलगे, दळवीज आर्टस्चे अजेय दळवी, व्ही. बी. पाटील, कोल्हापूर आर्ट फौंडेशनचे प्रशांत जाधव, ‘रंगबहार’चे विजय टिपुगडे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्यवाह गोविंद पाटील, डॉ. विनोद कांबळे, आदी उपस्थित होते.