शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने बैठक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

जयसिंगपूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ...

जयसिंगपूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विकास खारगे यांच्याकडे मुंबई येथे त्यांची भेट घेऊन देण्यात आले. पाणी प्रदूषणाची परिस्थिती बिघडण्यापूर्वीच हा प्रश्न मार्गी लावावा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीने वेळोवेळी आंदोलने केली आहेत, मात्र प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे शेतीदेखील विषारी बनत आहे. नदीचे प्रदूषण वेळीच रोखले पाहिजे, अन्यथा येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याची गरज आहे.

इचलकरंजी, कोल्हापूर येथील उद्योजकांची कारखान्यात जाणाºया केमिकलयुक्त पाण्यावर सध्या होत असलेल्या प्रक्रियेपेक्षा अद्ययावत यंत्रणेद्वारे प्रक्रिया करून त्याच पाण्याचा पुनर्वापर करण्याची तयारी आहे. उद्योजकांना प्रकल्प उभारण्यासाठी वीज दरामध्ये सवलती देणे, केंद्र व राज्य सरकारकडून पर्यावरण खात्याकडून प्रकल्प अनुदान उपलब्ध करून देणे. सीईटीपी प्लँटसाठी जागा व शासनाकडून अनुदान, आदी गोष्टींना सवलती दिल्यास नदीचे प्रदूषण थांबले जाईल. यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घ्यावी. जेणेकरून प्रदूषण थांबविण्यासाठी ठोस उपाययोजाना करण्यासाठी योग्य निर्णय घेता येईल, असेही शेट्टी म्हणाले.

फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - मुंबई येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विकास खारगे यांना मागण्यांबाबतचे निवेदन दिले.