शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने बैठक घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

जयसिंगपूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ...

जयसिंगपूर : पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी तातडीने उच्चस्तरीय बैठक घ्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विकास खारगे यांच्याकडे मुंबई येथे त्यांची भेट घेऊन देण्यात आले. पाणी प्रदूषणाची परिस्थिती बिघडण्यापूर्वीच हा प्रश्न मार्गी लावावा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानीने वेळोवेळी आंदोलने केली आहेत, मात्र प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. प्रदूषित पाण्यामुळे शेतीदेखील विषारी बनत आहे. नदीचे प्रदूषण वेळीच रोखले पाहिजे, अन्यथा येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्याची गरज आहे.

इचलकरंजी, कोल्हापूर येथील उद्योजकांची कारखान्यात जाणाºया केमिकलयुक्त पाण्यावर सध्या होत असलेल्या प्रक्रियेपेक्षा अद्ययावत यंत्रणेद्वारे प्रक्रिया करून त्याच पाण्याचा पुनर्वापर करण्याची तयारी आहे. उद्योजकांना प्रकल्प उभारण्यासाठी वीज दरामध्ये सवलती देणे, केंद्र व राज्य सरकारकडून पर्यावरण खात्याकडून प्रकल्प अनुदान उपलब्ध करून देणे. सीईटीपी प्लँटसाठी जागा व शासनाकडून अनुदान, आदी गोष्टींना सवलती दिल्यास नदीचे प्रदूषण थांबले जाईल. यासाठी तातडीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घ्यावी. जेणेकरून प्रदूषण थांबविण्यासाठी ठोस उपाययोजाना करण्यासाठी योग्य निर्णय घेता येईल, असेही शेट्टी म्हणाले.

फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०८

फोटो ओळ - मुंबई येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विकास खारगे यांना मागण्यांबाबतचे निवेदन दिले.