शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मीना यांना पदभार घेण्यापासून रोखले

By admin | Updated: June 10, 2015 00:07 IST

राष्ट्रीय राजधानीत आम आदमी पार्टीचे सरकार आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यातील अधिकारवाद शमण्याची चिन्हे नाहीत.

प्रदीप शिंदे- कोल्हापूर  प्रवासभाडे सवलतीच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एस. टी. महामंडळाकडून विविध प्रकारच्या एकूण ३५ सवलती देण्यात येतात. जिल्ह्यात एका वर्षात एक कोटी ९५ लाख ४० हजार ५५ लाभार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घेतला. कोटीच्या घरातील प्रवाशांनी याचा फायदा घेतल्याने सवलतीची एस.टी. सुसाट असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते.राज्य सरकारकडून शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, क्षयग्रस्त, विविध पुरस्कार विजेते यांना सामाजिक बांधीलकीतून एस.टी.च्या प्रवासभाड्यात सवलत देण्यात आली आहे. कोणाला तिकिटाच्या पन्नास टक्के, तर कोणाला शंभर टक्के सवलत आहे. ही सवलतीची रक्कम राज्य सरकार एस. टी. महामंडळाला देत असते. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ मधील लाभार्थी पाहता एस.टी.कडे सर्व घटकांचा ओढा वाढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा मोठा आधारअहिल्याबाई होळकर योजना : इयत्ता ५ वी ते १० वी ग्रामीण भागातील मुलींना मोफत एस.टी. प्रवास. विद्यार्थी मासिक पास ६६.६७ टक्के सवलत. विद्यार्थी मोठ्या सुटीत मूळ गावी येणे किंवा आजारी आई-वडिलांना भेटावयास जाण्या-येण्यासाठी ५० टक्के सवलत. विद्यार्थ्यांना नैमित्तिक करार ५० टक्के. राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेले खेळाडू ३३.३३ टक्के. शैक्षणिक स्पर्धांसाठी ५० टक्के. ज्येष्ठ नागरिक ५० टक्के, क्षयरोग ५० टक्के, कर्करोगी ५० टक्के, कुष्ठरोगी ७५ टक्के, अपंग व्यक्ती ७५ टक्के , अंध व्यक्ती ७५ टक्के, अंध व्यक्ती साथीदार ५० टक्के यांच्यासह अधिस्वीकृतीधारक पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे एक साथीदार, आदिवासी पुरस्कारप्राप्त व्यक्ती व एक साथीदार, दलितमित्र, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव, द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कारप्राप्त व्यक्ती, पंढरपूर आषाढी-कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान मिळालेल्यांना १०० टक्के सवलत देण्यात येते.राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध प्रकारच्या ३५ सवलती दिल्या जातात. याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील माध्यमिक, उच्च माध्यमिकसह तांत्रिक शिक्षणच्या विद्यार्थ्यांना होतो. ज्येष्ठ नागरिक, अपंगांना एसटी बसचा प्रवास सोयीस्कर ठरत आहे. - पी. व्ही. पाऊसकर, विभागीय वाहतूक अधिकारी सर्वांत जास्त यांनी घेतला फायदा एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील एक कोटी ५८ लाख ४९ हजार ५२८ ज्येष्ठ नागरिकांनी एस.टी. सवलतीचा फायदा घेतला. त्यांच्यापाठोपाठ १८ लाख ५८ हजार ३७ अपंग व्यक्तींनी लाभ घेतला; तर पाच लाख ३३ हजार ६०१ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.