शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली मेख

By admin | Updated: July 6, 2015 00:28 IST

मच्छिंद्र सकटे : दलित महासंघाचा मेळाव्यात मोदी, फडणवीस सरकारवर टीका

कोल्हापूर : ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’च्या नावाखाली मोदी आणि फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या हितालाच मेख मारली आहे. आज हिंदू राष्ट्रवादामुळे शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार मागे पडले आहेत. दलितांवरील अत्याचार वाढल्यामुळे हिंदू राष्ट्रवादाला रोखण्यासाठी दलित महासंघाने तीव्र संघर्षाचा निर्धार केल्याचे महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले.दलित महासंघाच्या २४ व्या वर्धापनदिनी रविवारी येथील शाहू स्मारक भवनात निर्धार मेळाव्यात अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी भटक्या-विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने उपस्थित होते.डॉ. सकटे म्हणाले, आरएसएस आजही आपले कर्मठ विचार सोडायला तयार नाही. स्वत:मध्ये बदल घडवून न आणणाऱ्यांचे सरकार देशामध्ये कसे बदल घडविणार? गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे गोरगरिबांचे आर्थिक नुकसान होत आहे. मराठ्यांना व मुस्लिमांना आरक्षणापासून डावलले जात आहे; पण याविरोधात कुणीच काही बोलत नाहीत. पूर्वी लोक अडाणी, अंधश्रद्धाळू व गरीब होते; पण ते नेता चांगला निवडत होते. आज लोक सुशिक्षित झाले पण नेता अडाणी, अशी परिस्थिती आहे. शाहू-फुले-आंबेडकर आणि अण्णा भाऊंचे विचार ही आमची शिदोरी असल्याचे डॉ. सकटे यांनी सांगितले.लक्ष्मण माने म्हणाले, गरीबांच्या संघटना बांधणे आज कठीण झाले आहे. कार्यकर्तेच दलाल झाल्यामुळे पुरोगामी चळवळ धोक्यात आहे. आमिषापोटी तरुणांना वेगळ्या वाटेवर नेले जात आहे. हे रोखण्यासाठी तरुणांना चळवळीत संधी दिली पाहिजे. दलित संघटनांनी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांवरही लढावे. प्रतिगामी शक्तींची सत्ता केंद्रात असल्यामुळे पुरोगामी गटातील सर्व जातिसमूहांनी एकत्रित येऊन लढा उभारला तरच टिकाव लागणार आहे. डॉ. गुरव म्हणाले, आपण अहंकार सोडत नाही तोपर्यंत जातिव्यवस्था तशीच राहील. जातियवादी ‘आरएसएस’चा लोकशाही मार्गाने पराभव करण्यासाठी पुढे या. सर्वजण एकत्र आले तर या प्रतिगाम्यांची सत्ता उलथवून टाकणे अशक्य नाही. दारिद्र्य, विषमता, अंधश्रद्धा, अनारोग्य, व्यसन संपले तरच बहुजनांची प्रगती होईल. जिल्हाध्यक्ष लालासो नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब दबडे, बाबूराव आयवाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पुष्पलता सकटे, अनिल मिसाळ, अजित भोरे, सुरेश महापुरे, आदी उपस्थित होते. प्रा. अमोल महापुरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आठवले यांच्याकडून दलित कविता बदनाम दलित कविता रामदास आठवलेंनी बदनाम केली. ल ला ल आणि ट ला ट जुळवून संसदेत कविता करण्याची काय गरज आहे? अशा वृत्तीमुळे आंबेडकरी चळवळ पुढे जाणार नाही. आंबेडकरवादी चळवळीत काम करताना अशा पद्धतीने व्यक्त होणे चुकीचे आहे, अशी टीका लक्ष्मण माने यांनी केली.गुडसा आंदोलन गोवंश हत्याबंदी कायदा करून फडणवीस सरकारने गोरगरिबांच्या तोंडचा घासच काढून घेतला आहे. याला विरोध करण्यासाठी दलित महासंघातर्फे गुडसा आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. सकटे यांनी दिला.