शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी कामगारांचा प्रवास होणार सुखाचा

By admin | Updated: January 5, 2017 01:02 IST

कारखान्याच्या दारात एस.टी. : मागणीनुसार मिळणार बस; अवैध वाहतुकीतील धोका टळणार

प्रदीप शिंदे--कोल्हापूर --ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध वडापचा आधार घ्यावा लागतो. मात्र, या धोकादायक प्रवासात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या गावांतून एम.आय.डी.सी.पर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. जिल्ह्यामध्ये गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित या औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामीण भागातील कामगार रोजगारासाठी येतात. त्यांपैकी काहीजण दुचाकीवरून प्रवास करतात. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तर ज्यांच्याकडे दुचाकी नाही, त्या कामगारांना व्हॅन, अ‍ॅपेरिक्षा, रिक्षा, जीप यांतून प्रवास करावा लागतो आहे. हे वाहनधारक जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जादा फेऱ्या करण्यासाठी वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे या मार्गावर अपघातांमध्ये वाढ होत आहे. निपाणी-मुरगूड राज्यमार्गावर गेल्याच महिन्यात बस्तवडे (ता. कागल) येथे व्हॅन खणीत कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या सोयीसाठी गावातून एस. टी. उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यानुसार आता एस. टी. गाड्या सोडण्याचे व कामगारांना ने-आण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कामगारांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणार आहे.४२ फेऱ्या प्रस्तावित...गोकुळ शिरगाव व पंचतारांकित कागल एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या व आजूबाजूच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या कामगारांच्या सोईसाठी ९१ फेऱ्या तिन्ही शिफ्टसाठी कोल्हापूर विभागातर्फे सुरू आहेत. मागणीनुसार या फेऱ्यांमध्ये वाढ करून ३० फेऱ्या नव्याने सुरू केल्या आहेत; ४२ फेऱ्या प्रस्तावित आहेत. नव्याने सुरू झालेल्या एस.टी. कागल पंचतारांकित एम.आय.डी.सी.: नंदगाव, कळे, कागल, गिरगाव, माद्याळ, मुरगूड, म्हाकवे, शेंडूर, गोरंबे, राधानगरी, गारगोटी ते एमआयडीसी.गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी : कागल, माद्याळ, करंजीवणे, सावर्डे, हदनाळ, रंकाळा, कागल, नेर्ली, गडहिंग्लज ते एमआयडीसीकामगारांना सवलत : एस. टी. महामंडळाकडून कामगारांना प्रवासी पास दिला जातो. यामध्ये २० दिवसांच्या पैशात ३० दिवसांचा प्रवास करायचा, तर तीन महिन्यांसाठी ५० दिवसांचे पैसे भरायचे आणि ९० दिवस प्रवास करायचा, अशा दोन पासची सोय आहे. अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगार आता एस.टी.ला पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे अनेक गावांतून एमआयडीसीपर्यंत गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. आता गावातील मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढविली जात आहे.- नवनीत भानप, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग