शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

महापौर भाजपचाच होईल

By admin | Updated: November 5, 2015 00:09 IST

चंद्रकांतदादा पाटील : जल्लोषाची तयारी करा, चमत्कार शक्य

कोल्हापूर : राजकारणात चमत्कार घडत असतात. त्यामुळे १६ तारखेला कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल. दोन दिवसांत ‘गुड न्यूज’ देतो. विजयी मिरवणुकीच्या तयारी लागा, असा गौैप्यस्फोट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. मंगळवारी येथील ताराराणी चौकातील हॉटेलमध्ये भाजप-ताराराणी आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा करून खळबळ उडवून दिली. सत्तेपासून दूर राहिलो असलो तरी आम्ही प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून काम करू, असे सोमवारी निकालानंतर सांगणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी २४ तासांच्या आतच घुमजाव करत महापौरपदाच्या स्पर्धेत आपणही असल्याचे जाहीर केले. भाजप-ताराराणी आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार व पराभूतांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम झाला. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल. त्यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे घातले आहे. तसेच माझ्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उद्या मुंबईला आणि परवा दिल्लीला जाणार आहे.’ मेळाव्यात पाटील म्हणाले, ‘आपल्याला स्वच्छ कारभार करावयाचा आहे. विजयी उमेदवारांनी आपल्या प्रभागात २५ वर्षे भाजप-ताराराणीची सत्ता राहिली, यासाठी कामाचे नियोजन करावे. त्यांनी मनपाची एकही बैठक चुकविता कामा नये. स्थायी समिती, अन्य कोणत्याही निवडणुकीवेळी गैरहजर राहू नये; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू. पराभूतांना नगरसेवकाइतकाच सन्मान देऊ. यावेळी सुभाष रामुगडे, ताराराणी आघाडीचे स्वरूप महाडिक, सुनील मोदी, सुनील कदम, आदींसह विजयी, पराभूत उमेदवार उपस्थित होते. ‘कारभाऱ्यां’विरोधात नाईकनवरे यांची तक्रारया मेळाव्यात व्हीनस कॉर्नर प्रभागातून पराभूत झालेले प्रकाश नाईकनवरे यांनी मला पाडण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीतील काही कारभाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून फिल्डिंग लावली होती. त्यामुळे काही मोजक्या मतांनी माझा पराभव झाला. मी निवडून आलो असतो तर, भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ वाढले असते. मला पाडण्यासाठी कारणीभूत कारभाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.पराभूत उमेदवारांचा सन्मान राखणारभाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतही भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता येईल. त्यादृष्टीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजप-ताराराणी आघाडीकडून लढलेल्या; पण पराभूत झालेल्या उमेदवारांचा सन्मान राखला जाईल. त्यांना ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ तसेच विविध महामंडळे, समितींवरील पदे दिली जातील.