शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महापौर भाजपचाच होईल

By admin | Updated: November 5, 2015 00:09 IST

चंद्रकांतदादा पाटील : जल्लोषाची तयारी करा, चमत्कार शक्य

कोल्हापूर : राजकारणात चमत्कार घडत असतात. त्यामुळे १६ तारखेला कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल. दोन दिवसांत ‘गुड न्यूज’ देतो. विजयी मिरवणुकीच्या तयारी लागा, असा गौैप्यस्फोट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. मंगळवारी येथील ताराराणी चौकातील हॉटेलमध्ये भाजप-ताराराणी आघाडीच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा करून खळबळ उडवून दिली. सत्तेपासून दूर राहिलो असलो तरी आम्ही प्रबळ ‘विरोधी पक्ष’ म्हणून काम करू, असे सोमवारी निकालानंतर सांगणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी २४ तासांच्या आतच घुमजाव करत महापौरपदाच्या स्पर्धेत आपणही असल्याचे जाहीर केले. भाजप-ताराराणी आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार व पराभूतांना प्रोत्साहन देण्याचा कार्यक्रम झाला. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कोल्हापूरचा महापौर भाजपचाच होईल. त्यासाठी करवीरनिवासिनी अंबाबाईला साकडे घातले आहे. तसेच माझ्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उद्या मुंबईला आणि परवा दिल्लीला जाणार आहे.’ मेळाव्यात पाटील म्हणाले, ‘आपल्याला स्वच्छ कारभार करावयाचा आहे. विजयी उमेदवारांनी आपल्या प्रभागात २५ वर्षे भाजप-ताराराणीची सत्ता राहिली, यासाठी कामाचे नियोजन करावे. त्यांनी मनपाची एकही बैठक चुकविता कामा नये. स्थायी समिती, अन्य कोणत्याही निवडणुकीवेळी गैरहजर राहू नये; अन्यथा त्यांच्यावर कारवाई करू. पराभूतांना नगरसेवकाइतकाच सन्मान देऊ. यावेळी सुभाष रामुगडे, ताराराणी आघाडीचे स्वरूप महाडिक, सुनील मोदी, सुनील कदम, आदींसह विजयी, पराभूत उमेदवार उपस्थित होते. ‘कारभाऱ्यां’विरोधात नाईकनवरे यांची तक्रारया मेळाव्यात व्हीनस कॉर्नर प्रभागातून पराभूत झालेले प्रकाश नाईकनवरे यांनी मला पाडण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीतील काही कारभाऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून फिल्डिंग लावली होती. त्यामुळे काही मोजक्या मतांनी माझा पराभव झाला. मी निवडून आलो असतो तर, भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ वाढले असते. मला पाडण्यासाठी कारणीभूत कारभाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.पराभूत उमेदवारांचा सन्मान राखणारभाजपचे केंद्र आणि राज्यात सरकार आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेतही भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता येईल. त्यादृष्टीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रयत्न सुरू असल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. ते म्हणाले, भाजप-ताराराणी आघाडीकडून लढलेल्या; पण पराभूत झालेल्या उमेदवारांचा सन्मान राखला जाईल. त्यांना ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ तसेच विविध महामंडळे, समितींवरील पदे दिली जातील.