शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

By संदीप आडनाईक | Updated: September 14, 2025 18:46 IST

दलित समाजाचे विखुरलेले राजकारण एकत्र करण्याची गरज आहे.

कोल्हापूर :देशातील दलित भविष्यात एकत्र आल्यास त्याचे नेतृत्व मायावती यांनी करावे, कारण त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद दोन्ही आहे, अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

आठवले पुढे म्हणाले, दलित समाजाचे विखुरलेले राजकारण एकत्र करण्याची गरज आहे. संविधानाने अधिकार व आरक्षण दिले असले तरी अनेक ठिकाणी भेदभाव सुरूच आहे. दलितांना स्वतंत्र राजकीय आवाज मिळायला हवा.

भाजपसोबतच्या युतीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, मोदी सरकारने दलितांसाठी अनेक योजना राबवल्या असून, ही भागीदारी सकारात्मक ठरली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीने जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

एक ठाकरे आमच्याकडे येतील

रामदास आठवले यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवरही भाष्य केलं आहे. यातील एक ठाकरे आमच्याकडे येतील असा दावा तूनी केला. पण ‘दोन्ही ठाकरे बंधु जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल परिणाम होणार नाही. उलट महायुतीला फायदाच होईल. दोन्ही ठाकरेंच्या सगळीकडे बातम्या येतील, मात्र महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिकेत त्यांना अजिबात यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर यंदा महायुतीचाच झेंडा फडकणार आहे.’

प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार का?

रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्याबाबतही भाष्य केले आहे. ‘मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर दलित समाजाला अत्यानंद होईल. यामुळे महाराष्ट्राच्या उलथापालथ होईल. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिन्ही नातू तीन गटात आहेत. ते कधी ऐक्यासाठी उत्सुक नव्हते. आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे आम्ही दोघे एकत्र येणे अशक्य आहे’ असं ते म्हणाले.

संजय राऊत खोटारडे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्ष निरर्थक मुद्दे पुढे करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, अशी टीका केली. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने न घेण्याचा सल्ला देत आठवले म्हणाले की ते नेहमी खोट्या व निरर्थक गोष्टी बोलतात. जे राहुल हांधी मत चोरी बद्दल बोलतात त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी मते राखता आली नाहीत असा टोला हाणला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेmayawatiमायावती