शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

By संदीप आडनाईक | Updated: September 14, 2025 18:46 IST

दलित समाजाचे विखुरलेले राजकारण एकत्र करण्याची गरज आहे.

कोल्हापूर :देशातील दलित भविष्यात एकत्र आल्यास त्याचे नेतृत्व मायावती यांनी करावे, कारण त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद दोन्ही आहे, अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

आठवले पुढे म्हणाले, दलित समाजाचे विखुरलेले राजकारण एकत्र करण्याची गरज आहे. संविधानाने अधिकार व आरक्षण दिले असले तरी अनेक ठिकाणी भेदभाव सुरूच आहे. दलितांना स्वतंत्र राजकीय आवाज मिळायला हवा.

भाजपसोबतच्या युतीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, मोदी सरकारने दलितांसाठी अनेक योजना राबवल्या असून, ही भागीदारी सकारात्मक ठरली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुतीने जागा द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

एक ठाकरे आमच्याकडे येतील

रामदास आठवले यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवरही भाष्य केलं आहे. यातील एक ठाकरे आमच्याकडे येतील असा दावा तूनी केला. पण ‘दोन्ही ठाकरे बंधु जरी एकत्र आले तरी महाराष्ट्राच्या राजकारणावर बिलकुल परिणाम होणार नाही. उलट महायुतीला फायदाच होईल. दोन्ही ठाकरेंच्या सगळीकडे बातम्या येतील, मात्र महाराष्ट्रासह मुंबई महानगरपालिकेत त्यांना अजिबात यश मिळणार नाही. मुंबई महानगरपालिकेवर यंदा महायुतीचाच झेंडा फडकणार आहे.’

प्रकाश आंबेडकरांसोबत युती करणार का?

रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांसोबत युती करण्याबाबतही भाष्य केले आहे. ‘मी आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित आलो तर दलित समाजाला अत्यानंद होईल. यामुळे महाराष्ट्राच्या उलथापालथ होईल. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तिन्ही नातू तीन गटात आहेत. ते कधी ऐक्यासाठी उत्सुक नव्हते. आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे आम्ही दोघे एकत्र येणे अशक्य आहे’ असं ते म्हणाले.

संजय राऊत खोटारडे

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस पक्ष निरर्थक मुद्दे पुढे करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतो, अशी टीका केली. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने न घेण्याचा सल्ला देत आठवले म्हणाले की ते नेहमी खोट्या व निरर्थक गोष्टी बोलतात. जे राहुल हांधी मत चोरी बद्दल बोलतात त्यांनी उपराष्ट्रपती पदासाठी मते राखता आली नाहीत असा टोला हाणला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेmayawatiमायावती