शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

२८ मे. टन मळीचा टँकर पकडला-दाजीपूर नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:18 IST

गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. २८ मे. टन मळीसह टँकर असा सुमारे १३ लाख

ठळक मुद्देमळी कायदेशीरपणे महाराष्ट्रात आणण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता.

कोल्हापूर : गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. २८ मे. टन मळीसह टँकर असा सुमारे १३ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित चालक ओमप्रकाश रामवध यादव (वय ४५, रा. हिंदुस्थान नगर, मुंबई) याला अटक केली आहे. त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तो दारू बनविण्यासाठी मळी सांगलीला घेऊन चालला होता. याप्रकरणी सखोल तपास सुरू असल्याची माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमारेषेवर दाजीपूर, राधानगरी, कानूर, चंदगड, आजरा, शिवनाकवाडी, कागल, गगनबावडा, आदी ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. कोल्हापुरात येणारे प्रत्येक वाहन तपासून सोडले जाते. ३१ मार्चला भरारी पथक राधानगरी तालुक्यात दाजीपूर चेकनाक्यावर तपासणी करीत असताना मळी घेऊन जाणारा टँकर मिळून आला. टॅँकरमध्ये मळी होती. हा द्रव पदार्थ सांगली जिल्ह्यात खत म्हणून शेतात टाकण्यासाठी आपण घेऊन जात आहे, असे चालक यादव याने पथकाला सांगितले; परंतु मळी कायदेशीरपणे महाराष्ट्रात आणण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे मद्य तयार करण्यासाठीच अशा प्रकारची मळी नेत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

टॅँकरमधील हे रसायन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले असता ती मळी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पुढील कारवाई करण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. यावेळी उपअधीक्षक बापूसो चौगुले, वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग पाटील, दुय्यम निरीक्षक अविनाश घाटगे, माधव चव्हाण, भीमराव बच्चे, प्रदीप गुरव, इंद्रजित कांबळे, ज्योती कंदले, आदी उपस्थित होते. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेला मळीचा टँकर व आरोपी. (छाया : दीपक जाधव) 

टॅग्स :Policeपोलिस