शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

मोर्चासाठी मावळे, रणरागिणी सज्ज

By admin | Updated: October 13, 2016 02:11 IST

मराठा क्रांती मोर्चा : उद्या रंगीत तालीम; गल्ली, पेठांमध्ये तालमी, मंडळांच्या बैठकांना जोर

कोल्हापूर : शनिवारी होणाऱ्या सकल मराठा मोर्चासाठी कोल्हापुरातील दहा हजार मावळे व रणरागिणी सज्ज झाले आहेत. या मोर्चाचे नियोजन, पार्किंगची ठिकाणे, आपत्ती व्यवस्थापन या सगळ््याच्या तयारीसाठी उद्या, शुक्रवारी पोलिस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, मावळे व रणरागिणींची प्रत्यक्ष मोर्चाच्या मार्गावर रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शहरातील गल्ल्यांमध्ये, पेठांमध्ये, तालीम, मंडळांमध्ये मोर्चात सहभागी होण्यासाठीच्या बैठका सुरू आहेत. शासकीय आकडेवारीनुसार मोर्चात किमान ३० लाख नागरिक सहभागी होणार आहेत. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या नागरिकांच्या सहभागाचे नियोजन करण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या मदतीला कोल्हापुरातील तरुण मावळे आणि रणरागिणी सरसावल्या आहेत. त्यांच्यासाठी बुधवारी न्यू कॉलेज येथे मोर्चा व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोर्चाला किंवा कोल्हापूरच्या नावलौकिकाला बाधा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य करू नका. स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी शहरासह बाह्य परिसरातील पार्किंगची ठिकाणे समजावून सांगितली. उद्या, शुक्रवारी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर मावळे आणि रणरागिणींनी जमायचे आहे. शेंडा पार्कात वाहनतळाची सफाईकोल्हापूर : शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण कोल्हापूर शहरात जय्यत तयारी सुरू केली आहे. बाहेरगावांहून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुख्य वाहनतळ असणाऱ्या शेंडा पार्क मैदानाची बुधवारी पाहणी करून येथे साफसफाई करण्यात आली. दरम्यान, ‘मोर्चाला यायचं’ असे जनजागृतीचे फलक संपूर्ण शहरासह जिल्हाभर झळकू लागले आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने निघणाऱ्या मराठा क्रांती विराट मोर्चाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर बैठका सुरू आहेत, तर विशेषत: युवा पिढीने या मोर्चाचे नेतृत्व हाती घेतल्याने त्याच्या नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे. या मोर्चामध्ये सुमारे ३० लाख नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असल्याने हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे. त्या पद्धतीने त्याचे नियोजन करण्यासाठी सारे कोल्हापूर सज्ज झाले आहे.या मोर्चातील स्वयंसेवकांची भूमिका बजावणारे मावळे व रणरागिणी शनिवारच्या लढ्यासाठी सज्ज झाले आहेत. सुमारे दहा हजार मावळे व रणरागिणींनी मोर्चासाठी आपली आचारसंहिता ठरवून घेतली आहे. त्याबाबत नियोजनासाठी त्यांची बुधवारी तिसरी बैठकही झाली.मोर्चाच्या जनजागृतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत, संपूर्ण शहरातील चौका-चौकांत ‘मोर्चाला यायचं’ असे भव्य फलक उभारले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर व जिल्हा डिजिटल फलकमय झाले आहे. प्रत्येक फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे व मराठेशाहीचा इतिहास रेखाटला आहे. याबाबत नियोजनसाठी असणारी ‘वॉररूम’ कार्यकर्त्यांनी फुलून गेली आहेत. (प्रतिनिधी)