शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

साहित्याचे मंथन होत राहणे गरजेचे

By admin | Updated: January 5, 2015 00:39 IST

ग्रंथमहोत्सव : साहित्य संमेलन काल, आज आणि उद्या परिसंवादातील सूर

सातारा (बाबा आमटे नगरी) : मराठी भाषेच्या जतनासाठी साहित्य संमेलने गरजेचे असून, यानिमित्ताने साहित्याचं मंथन होऊन भाषा समृद्धीसाठी पोषक वातावरण तयार होतं. त्यामुळे संमेलनेही गरजेचीच आहेत, असा सूर ग्रंथमहोत्सवातील ‘साहित्य संमेलन : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात व्यक्त झाला. ग्रंथमहोत्सवात शनिवार दुपारच्या सत्रात हा परिसंवाद झाला. माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख-पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, पुण्याचे माजी महापौर दिलीप बराटे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनी या परिसंवादात सहभाग घेतला होता. साहित्य संमेलनांच्या बाबतीत अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. या पार्श्वभूमीवर या परिसंवादातील चर्चेला महत्त्व आले होते. या अनुषंगाने अत्यंत पोषक अशी चर्चाही यावेळी झाली. ‘मराठी आपली आई आहे आणि दिवाळीप्रमाणे तिचा उत्सव आपण साजरा करायला पाहिजे. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून हे घडत असते. दर वीस वर्षांनी पिढी बदलत असते. त्यामुळे या पिढीला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची आणि त्यांच्यापर्यंत सकस साहित्य पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक साहित्यिकावर असते. सातारच्या ग्रंथमहोत्सवाने गेल्या १६ वर्षांपासून लीलया ही जबाबदारी पेलली आहे. मराठीच्या जागरासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची तयारी ठेवावी. यामध्ये संयोजकांची भूमिका महत्त्वाची ठरते. कितीही टीका झाली, अथवा आरोप झाले तरी आयोजकांनी कणखरपणे तिला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.’ यावेळी त्यांनी औरंगाबाद येथे गुलजार यांच्याशी झालेल्या चर्चेचे सार सांगितले. ‘बारीश को रोक नहीं सकते पर अनाज को सांभालके रखिए!’ या सूचक शब्दांत गुलजार यांनी आरोप कसे झेलावेत, याचे स्पष्टीकरण केले. भारत देसडला म्हणाले, ‘पंजाबमधील घुमान येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन केल्यानंतर याठिकाणी मराठी साहित्यप्रेमी येणार का, असा सवाल उपस्थित केला गेला. मात्र, जगभरातील मराठी लोकांनी या संमेलनाला प्रतिसाद दिला आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी पंजाबी लोकांशी मराठीचा धागा जोडला आहे. पंजाबी लोकांना मराठीचा नेहमीच आदर राहिला आहे.’रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, दिलीप बराटे, प्रकाश पायगुडे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)परिसंवादात वाजले शाब्दिक फटाके‘आमची मुले इंग्रजी शाळेत शिकतात. त्यांच्यापर्यंत मराठीचा जागर होणे आवश्यक आहे. याबाबत लोक मागणी करत असतात,’ असे शिरीष चिटणीस यांनी सांगितले. त्यांच्या मागणीवर कोटी करताना रामदास फुटाणे यांनी ‘साहित्यिक आपली मुले इंग्रजी शाळेत का घालतात?, त्यांनीच जर आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले तर हा प्रश्न उपस्थित होणार नाही,’ असे म्हणत शाब्दिक फटाके फोडले.