शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

साहित्याचे मंथन होत राहणे गरजेचे

By admin | Updated: January 5, 2015 00:39 IST

ग्रंथमहोत्सव : साहित्य संमेलन काल, आज आणि उद्या परिसंवादातील सूर

सातारा (बाबा आमटे नगरी) : मराठी भाषेच्या जतनासाठी साहित्य संमेलने गरजेचे असून, यानिमित्ताने साहित्याचं मंथन होऊन भाषा समृद्धीसाठी पोषक वातावरण तयार होतं. त्यामुळे संमेलनेही गरजेचीच आहेत, असा सूर ग्रंथमहोत्सवातील ‘साहित्य संमेलन : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात व्यक्त झाला. ग्रंथमहोत्सवात शनिवार दुपारच्या सत्रात हा परिसंवाद झाला. माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख-पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, पुण्याचे माजी महापौर दिलीप बराटे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनी या परिसंवादात सहभाग घेतला होता. साहित्य संमेलनांच्या बाबतीत अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. या पार्श्वभूमीवर या परिसंवादातील चर्चेला महत्त्व आले होते. या अनुषंगाने अत्यंत पोषक अशी चर्चाही यावेळी झाली. ‘मराठी आपली आई आहे आणि दिवाळीप्रमाणे तिचा उत्सव आपण साजरा करायला पाहिजे. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून हे घडत असते. दर वीस वर्षांनी पिढी बदलत असते. त्यामुळे या पिढीला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची आणि त्यांच्यापर्यंत सकस साहित्य पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक साहित्यिकावर असते. सातारच्या ग्रंथमहोत्सवाने गेल्या १६ वर्षांपासून लीलया ही जबाबदारी पेलली आहे. मराठीच्या जागरासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची तयारी ठेवावी. यामध्ये संयोजकांची भूमिका महत्त्वाची ठरते. कितीही टीका झाली, अथवा आरोप झाले तरी आयोजकांनी कणखरपणे तिला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.’ यावेळी त्यांनी औरंगाबाद येथे गुलजार यांच्याशी झालेल्या चर्चेचे सार सांगितले. ‘बारीश को रोक नहीं सकते पर अनाज को सांभालके रखिए!’ या सूचक शब्दांत गुलजार यांनी आरोप कसे झेलावेत, याचे स्पष्टीकरण केले. भारत देसडला म्हणाले, ‘पंजाबमधील घुमान येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन केल्यानंतर याठिकाणी मराठी साहित्यप्रेमी येणार का, असा सवाल उपस्थित केला गेला. मात्र, जगभरातील मराठी लोकांनी या संमेलनाला प्रतिसाद दिला आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी पंजाबी लोकांशी मराठीचा धागा जोडला आहे. पंजाबी लोकांना मराठीचा नेहमीच आदर राहिला आहे.’रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, दिलीप बराटे, प्रकाश पायगुडे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)परिसंवादात वाजले शाब्दिक फटाके‘आमची मुले इंग्रजी शाळेत शिकतात. त्यांच्यापर्यंत मराठीचा जागर होणे आवश्यक आहे. याबाबत लोक मागणी करत असतात,’ असे शिरीष चिटणीस यांनी सांगितले. त्यांच्या मागणीवर कोटी करताना रामदास फुटाणे यांनी ‘साहित्यिक आपली मुले इंग्रजी शाळेत का घालतात?, त्यांनीच जर आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले तर हा प्रश्न उपस्थित होणार नाही,’ असे म्हणत शाब्दिक फटाके फोडले.