शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी होणार

By admin | Updated: September 18, 2014 00:23 IST

चिरायू योजनेचा प्रारंभ : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची मोहीम

कोल्हापूर : आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून माता मृत्यू व नवजात अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘चिरायू’ ही अभिनव योजना आणली आहे. त्याचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांच्या प्रयत्नांतून ‘कायापालट’ योजनेपाठोपाठ ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व असंरक्षित जोडप्यांच्या मासिक पाळीचे सनियंत्रण करणार आहे. ज्या असंरक्षित स्त्रीची मासिक पाळी सलग तीन महिने आलेली नाही, तिची निश्चय कीटद्वारे तपासणी करेल. ती स्त्री गरोदर असल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य सेविकेला देईल. आरोग्य सेविका त्या स्त्रीची नोंद गरोदर माता म्हणून पुस्तिकेत करेल. अशा प्रकारे बारा आठवड्याच्या आत नोंदणी केलेल्या सर्व गरोदर मातांची किमान चारवेळा वैद्यकीय तपासणी, शंभर दिवस लोहयुक्त गोळ्या, धनुर्वात प्रतिबंधक लस दिली जाईल. त्याचबरोबर आहार विषयक सल्ले दिले जातील. सुरक्षित प्रसुतीसाठी नातेवाइकांच्या मदतीने प्रसुतीचे ठिकाण निश्चित करेल. या सर्व सेवांचे संनियत्रण करण्यासाठी विहित नमुन्यात नोंद वही व अहवाल तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक बाळंतपण हे शासकीय आरोग्य संस्थेत करण्यावर या योजनेत भर आहे. प्रसुतीनंतर ४२ दिवस आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत भेटी देऊन स्तनपान, बाळ उबदार ठेवणे, नाळ स्वच्छ ठेवणे, हात स्वच्छ धुणे व बाळाला दवाखान्यात केव्हा घेऊन जावे याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे. ‘चिरायू’ योजनेत आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तालुका गटसमूह, संघटक व आशा गटप्रवर्तक यांची महत्त्वाची भूमिका आहे. दरम्यान, कायापालट योजनेत चांगले काम करणाऱ्या बांबवडे, भेडसगाव, कळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर आदी उपस्थित होते.चांगल्या कामासाठी बक्षीसया योजनमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, तालुका गटसमूहक यांच्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. बक्षीस योजनेंतर्गत दरमहा रोख बक्षीस देण्यात येईल.