शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

भरीव निधीने जिल्हा परिषद देशपातळीवर

By admin | Updated: October 26, 2015 00:09 IST

पंचगंगा प्रदूषण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी तयार केलेल्या १०८ कोटींच्या आराखड्यातील केंद्र आणि राज्याकडून निधी मिळविण्यात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला यश मिळाले नाही.

राज्यात नवे शासन आल्यानंतर एका वर्षात येथील जिल्हा परिषदेने केंद्र आणि राज्य स्तरांवरील विविध बक्षिसे मिळविली. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेची कामगिरी देशात जाऊन पोहोचली आहे. जिल्हा परिषदेतर्फे पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लाचखोर, भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. गैरव्यवहार प्रकरणी इतिहासात पहिल्यादांच प्रशासनाने दोषींवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत अत्युत्कृष्ट म्हणून पुणे विभागात या जिल्हा परिषदेने पहिला क्रमांक मिळविला. त्यानंतर केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेतही ही जिल्हा परिषद देशात भारी ठरली. जम्बो नोकरभरतीमध्ये अनेक आरोप झाले तरी अतिशय पारदर्शकपणे निवड प्रक्रिया राबविली.ग्रामपंचायतीमधील गतिमान प्रशासनासाठी ई- प्रशासनातही राज्यात जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आहे. कुपोषण मुक्तीच्या कामाबद्दल राज्याने या जिल्हा परिषदेची ‘मॉडेल’ म्हणून दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी शासनाच्या नियमानुसार प्राथमिक शिक्षकांनी मुख्यालयातच राहावे, असा धाडसी आदेश काढला. त्याला जोरदार विरोध झाला. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. पाणी योजनेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्यानंतर पन्हाळा तालुक्यातील सातवे आणि गडहिंग्लज तालुक्यातील जांभूळवाडी येथील दोषींवर फौजदारी करण्याचा आदेश राजकीय दबाव जुगारून सीईओ सुभेदार यांनी दिला. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जिल्हा परिषदेच्या नावावर झाली. ‘आनंदवन’साठी जिल्हा परिषदेने तब्बल ३०० बॉक्स कपडे संकलित करून पाठविले. आरोग्य विभागाने नवोपक्रम म्हणून राबविलेली ‘कायापालट’ योजना शासनाने स्वीकारला. राज्यात राबविण्यासंबंधी शासन निर्णय काढला. दरम्यान, पंचगंगा प्रदूषण कायमस्वरूपी थांबविण्यासाठी तयार केलेल्या १०८ कोटींच्या आराखड्यातील केंद्र आणि राज्याकडून निधी मिळविण्यात जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला यश मिळाले नाही.