शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

मसाई पठारावरील ‘मसाई’च गायब

By admin | Updated: June 9, 2015 00:12 IST

तपास ‘जैसे थे’ : फक्त पठारच शिल्लक; अंधश्रद्धा की चोरी? ग्रामस्थांत चर्चा

कोतोली : कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ९०० एकर क्षेत्र असलेल्या पठारावरील मसाई देवीच्या मंदिरातील पाच मूर्तींची चोरी झाली आहे. या घटनेला आठवडा लोटला तरी याबाबत तपास ‘जैसे थे’ आहे. यामुळे भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पौर्णिमेच्या रात्री मंदिरामधील सिंहासनावरील बैठी मसाईदेवीची दगडी मूर्ती, त्याचबरोबर तीन संगमरवरी मूर्ती, सहा घोडे अशा मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, तर याबाबत कोडोली पोलिसांनी तपास सुरू आहे असे सांगून आपले हात वर केले आहेत. या चोरीमुळे जिल्ह्यातील जागृत देवस्थानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यासाठी गेलेले मसाई देवीचे पुजारी गणपती दळवी यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यावेळी त्यांनी या चोरीच्या प्रकाराची माहिती कोडोली पोलीस ठाण्यात दिली. मसाई देवी ही कौल घेणे, कौल देणे अशा बाबतीत प्रसिद्ध आहे. यामुळे प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी या मसाई मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.सोमवारी (दि. १) पौर्णिमा होती. त्याच रात्री मसाई पठारावरील पाच मूर्तींच्या चोरीचा प्रकार घडला असून, पूर्वकालीन असलेल्या या दगडाच्या मूर्तींचे वजनही १५० ते २०० किलो एवढे होते, असे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे मूर्ती चोरणारे एक-दोघे नसणार असा प्राथमिक अंदाज परिसरातील नागरिकांनी लावला आहे. पूर्वी पठारावर जाण्यासाठी वाट नव्हती. पर्यटकांचा विचार करून बुधवार पेठमार्गे मसाई पठारावर येण्यासाठी रस्ता करण्यात आला होता; पण या रस्त्याचा उपयोग मात्र चोरट्यांनी चोरीच्या कामासाठी केला.सुमारे ९०० एकरांचे पठार असून, या ठिकाणी पांडवकालीन गुहा आहेत. पन्हाळ््याबरोबर मसाई पठारही प्रेमीयुगुलांचे मोक्याचे ठिकाण बनले होते, पण पौर्णिमेच्या रात्री मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याने अंधश्रद्धेचा विषय परिसरात जोरात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांनी या पूर्वकालीन मूर्ती विक्री करण्यासाठी तरी चोरल्या नसतील ना? अशी शक्यताही जोर धरत आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गोष्टींचा विचार करून तपास करणे गरजेचे आहे.देवीच्या २५ साड्या, एक सूप भरून कुंकू व दोन हजार रुपये मंदिराच्या बाहेर आढळून आल्याचे परिसरातील नागरिकांत बोलले जात आहे. त्यामुळे ही चोरी अंधश्रद्धेच्या माध्यमातून झाली असल्याचा अंदाज लावला जात आहे.९०० एकरांच्या पठारावरील मंदिरातील पौर्णिमेच्या रात्री पाच मूर्ती चोरीला जाणे व त्या ठिकाणी पारंपरिक विधी घेणे ही गोष्ट अंधश्रद्धेची आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन विभागानेही लक्ष घालावे.मसाई पठारावरील मूर्ती चोरीला जाणे, ही गोष्टच लाजिरवाणी असून, या चोरीच्या मागे धर्मांध शक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. - बाजीराव उदाळे, सरपंच, वाघवे