शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
3
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
7
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
10
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
11
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
12
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
13
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
14
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
15
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
16
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
17
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
18
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
19
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
20
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

मसाई पठारावरील ‘मसाई’च गायब

By admin | Updated: June 9, 2015 00:12 IST

तपास ‘जैसे थे’ : फक्त पठारच शिल्लक; अंधश्रद्धा की चोरी? ग्रामस्थांत चर्चा

कोतोली : कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ९०० एकर क्षेत्र असलेल्या पठारावरील मसाई देवीच्या मंदिरातील पाच मूर्तींची चोरी झाली आहे. या घटनेला आठवडा लोटला तरी याबाबत तपास ‘जैसे थे’ आहे. यामुळे भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पौर्णिमेच्या रात्री मंदिरामधील सिंहासनावरील बैठी मसाईदेवीची दगडी मूर्ती, त्याचबरोबर तीन संगमरवरी मूर्ती, सहा घोडे अशा मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, तर याबाबत कोडोली पोलिसांनी तपास सुरू आहे असे सांगून आपले हात वर केले आहेत. या चोरीमुळे जिल्ह्यातील जागृत देवस्थानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यासाठी गेलेले मसाई देवीचे पुजारी गणपती दळवी यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यावेळी त्यांनी या चोरीच्या प्रकाराची माहिती कोडोली पोलीस ठाण्यात दिली. मसाई देवी ही कौल घेणे, कौल देणे अशा बाबतीत प्रसिद्ध आहे. यामुळे प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी या मसाई मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.सोमवारी (दि. १) पौर्णिमा होती. त्याच रात्री मसाई पठारावरील पाच मूर्तींच्या चोरीचा प्रकार घडला असून, पूर्वकालीन असलेल्या या दगडाच्या मूर्तींचे वजनही १५० ते २०० किलो एवढे होते, असे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे मूर्ती चोरणारे एक-दोघे नसणार असा प्राथमिक अंदाज परिसरातील नागरिकांनी लावला आहे. पूर्वी पठारावर जाण्यासाठी वाट नव्हती. पर्यटकांचा विचार करून बुधवार पेठमार्गे मसाई पठारावर येण्यासाठी रस्ता करण्यात आला होता; पण या रस्त्याचा उपयोग मात्र चोरट्यांनी चोरीच्या कामासाठी केला.सुमारे ९०० एकरांचे पठार असून, या ठिकाणी पांडवकालीन गुहा आहेत. पन्हाळ््याबरोबर मसाई पठारही प्रेमीयुगुलांचे मोक्याचे ठिकाण बनले होते, पण पौर्णिमेच्या रात्री मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याने अंधश्रद्धेचा विषय परिसरात जोरात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांनी या पूर्वकालीन मूर्ती विक्री करण्यासाठी तरी चोरल्या नसतील ना? अशी शक्यताही जोर धरत आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गोष्टींचा विचार करून तपास करणे गरजेचे आहे.देवीच्या २५ साड्या, एक सूप भरून कुंकू व दोन हजार रुपये मंदिराच्या बाहेर आढळून आल्याचे परिसरातील नागरिकांत बोलले जात आहे. त्यामुळे ही चोरी अंधश्रद्धेच्या माध्यमातून झाली असल्याचा अंदाज लावला जात आहे.९०० एकरांच्या पठारावरील मंदिरातील पौर्णिमेच्या रात्री पाच मूर्ती चोरीला जाणे व त्या ठिकाणी पारंपरिक विधी घेणे ही गोष्ट अंधश्रद्धेची आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन विभागानेही लक्ष घालावे.मसाई पठारावरील मूर्ती चोरीला जाणे, ही गोष्टच लाजिरवाणी असून, या चोरीच्या मागे धर्मांध शक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. - बाजीराव उदाळे, सरपंच, वाघवे