शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

शहीद शेतकरी, शहीद सैनिक अमर रहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST

कोल्हापूर : दिल्लीतील आंदोलनात शहीद झालेले शेतकरी व पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिक यांना रविवारी कोल्हापूरकरांनी बिंदू चौकात एकत्र जमून, ...

कोल्हापूर : दिल्लीतील आंदोलनात शहीद झालेले शेतकरी व पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिक यांना रविवारी कोल्हापूरकरांनी बिंदू चौकात एकत्र जमून, मेणबत्त्या पेटवून अभिवादन केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ‘शहीद शेतकरी अमर रहे, शहीद सैनिक अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्लीत आंदोलनाच्या ७७व्या दिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने रविवारी देशभर कँडल मार्चचे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापुरात समन्वय समितीचे सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, संभाजीराज जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मेणबत्त्या पेटवून शहिदांना अभिवादन करताना केंद्र सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.

या कँडल मार्चमध्ये इर्शाद फरास, दिलदार मुजावर, बी. एल. बर्गे, सिद्धार्थ कांबळे, कमलाकर रोटे, आशा बर्गे, टी. एस. पाटील, बाबा मिठारी, मधुकर हरेल, सदा भालकर, नामदेव उलपे, उज्ज्वला कदम, यशवंत पाटील, संग्राम माने, विजय लोंढे, शिवाजी पाटील हे सहभागी झाले.

चौकट ०१

भाजपच्या मंत्र्यांचा निषेध

भाजपशासित हरियाणाचे कृषिमंत्री जयप्रकाश दलाल यांनी आंदोलनातील शेतकरी हे हार्ट अटॅक व ताप येऊन मेलेले आहेत, ते घरी असते तरी मेलेच असते, असे वक्तव्य केले आहे. दलाल यांच्या या वक्तव्याचा कँडल मार्चच्या ठिकाणी तीव्र शब्दांत निषेध करून त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या गेल्या. शेतकऱ्यांप्रती भाजपची हीच का ती संवेदनशीलता? असा सवालही यावेळी करण्यात आला.

फोटो: १४०२२०२१-कोल-कॅन्डल मार्च

फाेटो ओळ : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने रविवारी सायंकाळी कोल्हापुरातील बिंदू चौकात मेणबत्त्या पेटवून शहीद शेतकरी व पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना अभिवादन केले.