शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

लग्नाची गाठ मृत्यूनंतरही कायम..!

By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST

भडगाव येथील दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू

गडहिंग्लज : गंभीर आजारी असणाऱ्या पत्नीला मृत्यूच्या दाढेतून आपण आता वाचवू शकणार नाही, याची हाय खाऊन दवाखान्यातच पतीचा मृत्यू झाला, तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून नातेवाईक घरी परतण्याआधीच पत्नीनेही दवाखान्यात जीवनयात्रा संपविली. मंगळवारी (दि. २७) येथील उपजिल्हा रुग्णालयात ही हृदयद्रावक घटना घडली असून, लक्ष्मीबाई मारुती पट्टणकुडी (वय ५५) आणि मारुती कल्लाप्पा पट्टणकुडी (६५, रा. भडगाव) अशी या दुर्दैवी दाम्पत्याची नावे आहेत.दि. २० रोजी दसऱ्याचा फराळ घेऊन लक्ष्मीबाई जरळी येथील नाईकवाडी वसाहतीत राहणाऱ्या दोन विवाहित मुलींकडे भडगावमधून चालत निघाल्या होत्या. दम्याच्या त्रासामुळे वाटेतच भोवळ येऊन पडल्यानंतर मुलींनीच त्यांना गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे पती मारुती हे सुश्रूषा करीत होते; पण लक्ष्मीबाई यांचा आजार बळावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याची सूचना डॉक्टरांनी केली. नातेवाइकांनी लक्ष्मीबाई यांना मंगळवारी (दि. २७) सकाळी कोल्हापूर येथे हलविण्याची तयारी केली; पण बेताची आर्थिक स्थिती आणि न परवडणाऱ्या खर्चाचा विचार करीत रुग्णालयात जेवण घेऊन आलेल्या मारुती यांना भोवळ आली आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.लक्ष्मीबाई यांना कोल्हापूरला नेण्याचे तात्पुरते स्थगित करून मारुती यांच्यावर नातेवाइकांनी भडगाव येथील बेरड समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. जड अंत:करणाने परतणारे नातेवाईक घरी पोहोचण्याआधीच लक्ष्मीबार्इंचीही रुग्णालयात प्राणज्योत मालवली. पुन्हा संध्याकाळी उशिरा त्यांचाही मृतदेह मारुती यांच्या शेजारीच दफन करण्यात आला. मात्र, एकाच दिवशी एका पाठोपाठ झालेल्या दोघांच्या मृत्यूने भडगाव गावावर शोककळा पसरली. (वार्ताहर)