शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

कोनवडे येथे आज शिवधर्मानुसार विवाह

By admin | Updated: January 18, 2015 00:36 IST

महामानवांच्या विचारांच्या मंगलाष्टका : रात्री व्याख्यान; अनावश्यक खर्चाला फाटा

शिवाजी सावंत / गारगोटीलग्न म्हटले की, अनावश्यक, वारेमाप खर्च, मानपान, रुसवे-फुगवे, काही वेळा अन्नाची नासाडी आणि रात्री वरातीत धांगडधिंगा, त्यातून होणारे वाद यामुळे लग्नाच्या आनंदावर विरजण पडते. हे सारे टाळण्यासाठी लग्न हा आनंदाचा सोहळा तसेच विचारांचा जागर होण्यासाठी केनवडे (ता. भुदरगड) येथील फौजदार राजेंद्र गुरव शिवधर्मानुसार विवाहबद्ध होणार आहेत. तासगाव (जि. सांगली) येथील तेजश्री गुरव हिच्याशी रविवारी (दि. १८) ते जन्मोजन्मीची सोबत करतील. तेजश्री या पदवीधर असून त्यांनाही अशा पद्धतीचा विवाह होणे सामाजिक बदलाच्या दृष्टीने आवश्यक वाटते.फौजदार गुरव यांच्या लग्नात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संत तुकाराम या महामानवांच्या विचारांचा जागर करणाऱ्या मंगलाष्टका म्हणण्यात येणार आहेत, तर अक्षता म्हणून तांदळाऐवजी फुले टाकण्यात येणार आहेत. अतिशय साध्या पद्धतीत ज्येष्ठ विचारवंत राजू शिरगुप्पे यांच्या हस्ते हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. रात्री वराती ऐवजी नांदेड येथील अमोल मिटकरी यांचे ‘छत्रपती संभाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व आजचा समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यापूर्वी गुरव यांचे थोरले बंधू रवींद्र यांनीही आपला विवाह पारंपरिक विधींना फाटा देऊन केला होता. दोन्ही बंधू स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानच्यावतीने अनिष्ठ प्रथेला फाटा देऊन नवविचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजेंद्र व तेजश्री यांचा हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.