शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

गूळ खरेदीत मार्केटिंग फेडरेशनने उतरावे शेतकºयांची बैठकीत मागणी : साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी ब्रँड खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:48 IST

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनने गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी गूळ उत्पादक शेतकºयांनी गुरुवारी बाजार समितीत आयोजित केलेल्या बैठकीत केली. साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी गुळाचा ब्रॅँड खराब झाल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिले. दरात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तम पाटील म्हणाले, गुळाचे उत्पादन तेवढेच राहिले; पण गूळ खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण पूर्वी घरात किती गूळ खात होतो आणि आता किती खातो, यासाठी गुळाचे मार्केटिंग व्हायला पाहिजे. बाजार समितीने पुढाकार घेऊन गुळातील पोषक घटकांचे मार्केटिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा. साखरमिश्रित गुळाचे प्रमाण वाढल्याचे सांगत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे म्हणाले, गुजरातमध्ये गूळ शीतगृहात ठेवला जातो. साखरमिश्रित गूळ शीतगृहात वितळत असल्याने कोल्हापूरचे नाव खराब होऊन मागणी कमी होत आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून राधानगरी तालुक्यातील चांदेचा गूळ कºहाडच्या मार्केटमध्ये जातो. तिथे चांगला दर मिळतो. मग येथे काय झाले?

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्यातील वजनदार नेते आहेत. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला असताना त्यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी दादासाहेब पाटील यांनी केली. केवळ मुहूर्ताच्या सौद्याला तुम्ही हजर राहू नका. रोज सौद्यात या, किमान तीनशे-चारशे रुपयांचा दरात फरक पडेल, अशी सूचना तानाजी आंग्रे यांनी केली. त्यावर आजपासून सौद्यात हजर राहून दर वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही सभापती कृष्णात पाटील यांनी दिली. उपसभापती अमित कांबळे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सापले, आदी उपस्थित होते.काटेंवर शेतकरी भडकले

भगवान काटे तीन वेळा भाषणासाठी उठून तेच-तेच मुद्दा मांडत राहिल्याने शेतकरी संतप्त झाले. ‘भाषणबाजी बंद करा, दहा वर्षे हेच ऐकतोय; केवळ पेपरमध्ये नाव येण्यासाठी बोलू नका. बाजार समितीचे संचालक म्हणून दर घसरणीवर उपाय काय करणार, ते सांगा?’ असे संजय पाटील (वडणगे) यांच्यासह शेतकºयांनी सुनावले.सदाभाऊंना भेटणारगुळाच्या दराच्या घसरणीबाबत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रविवारी (दि. ७) भेट घेणार आहे. सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी करणार असल्याचे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले.गुळाची गुणवत्ता तपासणीस प्रयोगशाळा

व्यापारी गुळाच्या रव्यात चाकू मारून त्याची गुणवत्ता ठरवितात. ही पद्धत चुकीची असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर गुळाच्या प्रतवारीसाठी लवकरच प्रयोगशाळा सुरू करीत असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.