शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

गूळ खरेदीत मार्केटिंग फेडरेशनने उतरावे शेतकºयांची बैठकीत मागणी : साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी ब्रँड खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:48 IST

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनने गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी गूळ उत्पादक शेतकºयांनी गुरुवारी बाजार समितीत आयोजित केलेल्या बैठकीत केली. साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी गुळाचा ब्रॅँड खराब झाल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिले. दरात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तम पाटील म्हणाले, गुळाचे उत्पादन तेवढेच राहिले; पण गूळ खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण पूर्वी घरात किती गूळ खात होतो आणि आता किती खातो, यासाठी गुळाचे मार्केटिंग व्हायला पाहिजे. बाजार समितीने पुढाकार घेऊन गुळातील पोषक घटकांचे मार्केटिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा. साखरमिश्रित गुळाचे प्रमाण वाढल्याचे सांगत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे म्हणाले, गुजरातमध्ये गूळ शीतगृहात ठेवला जातो. साखरमिश्रित गूळ शीतगृहात वितळत असल्याने कोल्हापूरचे नाव खराब होऊन मागणी कमी होत आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून राधानगरी तालुक्यातील चांदेचा गूळ कºहाडच्या मार्केटमध्ये जातो. तिथे चांगला दर मिळतो. मग येथे काय झाले?

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्यातील वजनदार नेते आहेत. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला असताना त्यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी दादासाहेब पाटील यांनी केली. केवळ मुहूर्ताच्या सौद्याला तुम्ही हजर राहू नका. रोज सौद्यात या, किमान तीनशे-चारशे रुपयांचा दरात फरक पडेल, अशी सूचना तानाजी आंग्रे यांनी केली. त्यावर आजपासून सौद्यात हजर राहून दर वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही सभापती कृष्णात पाटील यांनी दिली. उपसभापती अमित कांबळे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सापले, आदी उपस्थित होते.काटेंवर शेतकरी भडकले

भगवान काटे तीन वेळा भाषणासाठी उठून तेच-तेच मुद्दा मांडत राहिल्याने शेतकरी संतप्त झाले. ‘भाषणबाजी बंद करा, दहा वर्षे हेच ऐकतोय; केवळ पेपरमध्ये नाव येण्यासाठी बोलू नका. बाजार समितीचे संचालक म्हणून दर घसरणीवर उपाय काय करणार, ते सांगा?’ असे संजय पाटील (वडणगे) यांच्यासह शेतकºयांनी सुनावले.सदाभाऊंना भेटणारगुळाच्या दराच्या घसरणीबाबत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रविवारी (दि. ७) भेट घेणार आहे. सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी करणार असल्याचे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले.गुळाची गुणवत्ता तपासणीस प्रयोगशाळा

व्यापारी गुळाच्या रव्यात चाकू मारून त्याची गुणवत्ता ठरवितात. ही पद्धत चुकीची असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर गुळाच्या प्रतवारीसाठी लवकरच प्रयोगशाळा सुरू करीत असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.