शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

बाजार कर वसुली ठेकेदारीस विक्रेत्यांचा विरोध

By admin | Updated: April 30, 2017 00:59 IST

इचलकरंजी नगरपालिका सभेबाहेर निदर्शने : वाढीव दरांच्या निविदा सत्ताधाऱ्यांकडून मंजूर

इचलकरंजी : बाजार कर वसुली खासगी ठेकेदारांमार्फत करण्याच्या विषयाला शहरातील छोट्या विक्रेत्यांनी कडाडून विरोध केल्यामुळे हा विषय पुढील सभेत घेण्याचा निर्णय करण्यात आला. त्याचबरोबर नगराध्यक्षांनी हुकुमाने केलेली कामे, वाढीव दराच्या निविदा आदी प्रस्तावांना विरोध झाल्याने सत्तारूढ गटाने बहुमताच्या जोरावर हे विषय मंजूर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अलका स्वामी होत्या.विविध ४६ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी शनिवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेच्या पाणीपुरवठा विभागाकडील विविध कामांच्या ४.९० ते ३७.५० टक्के जादा रकमेच्या निविदांना मंजुरी देण्याच्या विषयाला काँग्रेस, शाहू आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. म्हणून भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी अतिमहत्त्वाचा विषय असल्याने त्यास एकमताने मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. जोरदार चर्चा झाल्यानंतर या विषयावर मतदान घेऊन तो मंजूर करून घेतला.बाजार कर वसुली खासगी मक्तेदारामार्फत करण्याच्या विषयाला शहरातील छोट्या व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, त्या विरोधात आंदोलन छेडले जात आहे. शहरातील फेरीवाले व भाजीपाला विक्रेत्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून सभागृहाबाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी झालेल्या घोषणाबाजीने सभागृह दणाणून सोडले. सभेत या विषयाबाबत कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागले असताना हा विषय कोणतीही चर्चा न होता पुढील सभेत घेण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान, हा विषय आता पालिकेच्या सभेत पुन्हा घेतला जाणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी दिली. नगरपालिका शिक्षण मंडळ मुख्याधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असले तरी शिक्षण मंडळात होणाऱ्या खर्चाचे धोरण ठरविण्याचे अधिकार नगरपालिका सभेला आहेत. म्हणून आगामी सभेमध्ये शिक्षण मंडळाबाबत धोरण ठरवावे, अशी मागणी शाहू आघाडीचे विठ्ठल चोपडे यांनी केली. याला सर्वांनी संमती दर्शविली. (प्रतिनिधी)आरोग्य विभागातील भ्रष्ट रॅकेट मोडून काढण्याची मागणीशाहू आघाडीचे नगरसेवक उदयसिंग पाटील यांनी आरोग्य खात्याकडील कर्मचारी दीपक गेजगे यांना लाचलुचपत खात्याने अटक केल्याबद्दल त्यांचे करण्यात आलेल्या निलंबनाचा विषय उपस्थित केला. त्यामध्ये आरोग्य खात्याकडे भ्रष्ट कारभार करणारे रॅकेट असून ते मोडून काढले पाहिजे, अशी मागणी केली. याला सत्तारूढ गटाचे तानाजी पोवार यांच्यासह सर्वांनी संमती दर्शविली. याबाबतचे अधिकार मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना देण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेत पाटील यांनी बाहुबलीला कटाप्पाने का मारले या चर्चेच्या विषयापेक्षा वाईट चर्चा आरोग्य विभागाकडील कारभाराची आहे, अशीही टीका केली.