शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कुंभोजात आता दररोजच भरतोय बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:25 IST

येथील ग्रामपंचायत तसेच कोरोना नियंत्रण समितीने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कडक नियमावली अंतर्गत दोन वेगवेगळ्या दिवशी भरणारा आठवडी बाजार बंद ...

येथील ग्रामपंचायत तसेच कोरोना नियंत्रण समितीने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कडक नियमावली अंतर्गत दोन वेगवेगळ्या दिवशी भरणारा आठवडी बाजार बंद केला. पण एकीकडे सद्य:स्थितीत शंभरीपार गेलेली रुग्णसंख्या चिंतेची बनली असताना मात्र गावात दररोजचाच बाजार भरू लागल्याने ग्रामपंचायतीची विक्रेत्यांपासून बाजारकर्त्यांसमोर काही मात्रा चालेना, असे चित्र दिसून येत असून नित्य बाजार ग्रामपंचायतीची डोकेदुखी बनला आहे.

ग्रामपंचायतीने कोरोना नियंत्रण समितीच्या सहकार्याने गावात कोरोना नियंत्रणासाठी सर्व आघाड्यांवर कडक नियमांची अंमलबजावणी केल्याने गत आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अगदी पन्नाशीच्या आत राहिली. तथापि या आठवड्यात मात्र कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार गेल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वेळोवेळी शासन अथवा ग्रामपंचायतीने पुकारलेल्या बंदला दुकानदार,व्यापारी, विक्रेते तसेच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.तथापि सकाळी ७ते११ वाजेपर्यंत फिरून भाजीपाला विक्रीची परवानगी असताना दीपक चौक तसेच बाजारपेठेत दररोजच ठाण मांडून बसणाऱ्या काही विक्रेत्यांमुळे एकेक करून अन्य फळे, भाजीपाला विक्रेते तसेच शेतकरीही बाजारात भाजीपाला विक्री करू लागल्याने बाजारकर्त्यांचीही गर्दी वाढू लागली आहे.यामुळे ग्रामपंचायतीची डोकेदुखी झाली असून कोरोना नियंत्रणासाठी सर्व आघाड्यांवर झटणाऱ्या ग्रामपंचायतीसमोर भाजीपाला विक्रेते तसेच बाजारकर्त्यांमुळे बाजारात होणाऱ्या नित्याच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन दररोजचा बाजार बंद करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.