शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

बाजार समितीची पाच कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. शेतीमाल विक्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारपासून कडक लॉकडाऊन सुरू झाल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसत आहे. शेतीमाल विक्री बंद असल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची पहिल्याच दिवशी पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली. सुमारे ८ हजार क्विंटल शेतीमाल घरातच राहिला असून, समितीला आर्थिक फटका बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक असल्याने जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. दूध व मेडिकल वगळता सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये भाजीपाला खरेदी-विक्रीची मुभा होती. मात्र, यावेळेला शेतीमाल विक्रीही बंद केली आहे. त्यामुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला, फळे, कांदा, बटाट्यासह सर्वच मार्केट सामसुम होते.

बाजार समितीमध्ये रोज भाजीपाला २५०० क्विंटल, फळे १ हजार क्विंटल, तर कांदा-बटाटा सुमारे साडेचार हजार क्विंटलची आवक होते. याशिवाय गूळ व इतर विभागातही आवक होते. लॉकडाऊनमुळे सुमारे आठ हजार क्विंटल शेतीमाल घरातच राहिला. पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, त्यातून बाजार समितीलाही आर्थिक झळ बसली आहे. उलाढालीवर १ टक्का कर आकारणी असते, त्यामुळे समितीला पहिल्याच दिवशी पाच लाखांचा फटका बसला.

कोट-

जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार रविवारपासून बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद आहेत. साधारणत: येथे रोज ८ हजार क्विंटलची आवक होते, ती पूर्णपणे थांबली.

- जयवंत पाटील (सचिव, बाजार समिती)

फोटो -

कोल्हापुरात रविवारपासून कडक लॉकडाऊन करण्यात आल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये अशी सामसूम होती. (फोटो-१६०५२०२१-कोल-बाजार समिती, बाजार समिती०१) (छाया- नसीर अत्तार)