शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बाजार समिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजीपाला उधळला

By admin | Updated: June 5, 2017 17:02 IST

शिल्लक माल विक्री रोखली : समितीत तणाव

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0५ : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी शिल्लक माल विक्री करताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तो रोखला. टोमॅटो, बटाट्यासह इतर भाजीपाला अक्षरश: उधळून लावल्याने समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा देण्यासाठी सोमवारी सौदे बंद ठेवले होते. पण रविवारी शिल्लक राहिलेला मालाची विक्री सोमवारी सकाळी सुरू होती. त्यावेळी युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांच्यांसह इतर कार्यकर्त्यांनी ती रोखली. ‘बंद म्हणजे बंद’, ‘शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणाबाजी करत अ‍ॅड. शिंदे यांनी विक्रीसाठी ठेवलेला टोमॅटो, लिंबू, बटाटा उधळून लावला. शिंदे यांनी अचानकपणे उचलाउचली सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला. व्यापाऱ्यांसह बाजार समिती कर्मचाऱ्यांनाही काही वेळ सुचेना,अखेर व्यापाऱ्यांनी शिंदे यांना थांबवून समजावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा रविवारी शिल्लक राहिलेला मालाची विक्री करत आहे, सोमवारी माल आलेलाच नाही. अडते-व्यापाऱ्यांचा शेतकरी संपास पाठींबा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन माल विक्री बंद करा अन्यथा उधळून लावू, असा इशारा दिला. अखेर पोलीसांनी हस्तक्षेप करून शिंदे यांना समिती आवारातून बाहेर काढले. त्यानंतर आदम मुजावर, मकरंद कुलकर्णी आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिनी मार्केट मधील भाजीपाला विक्री रोखली. तेथील माल उधळून लावल्याने पुन्हा गोंधळ उडाला.

व्यापारी व शिंदे यांच्यात बाचाबाची!

अ‍ॅड. शिंदे यांनी शेतीमाला विस्कटण्यास सुरूवात केल्यानंतर व्यापाऱ्यांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली. यावेळी व्यापारी व शिंदे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. 

आंदोलन सरकारच्या दारात करा

शेतकऱ्यांच्या जीवावरच आम्ही आहे. त्यांना चार पैसे जादा मिळाले पाहिजेत, यासाठी आमचाही प्रयत्न असतो. पण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मालाची नासधूस करून काय मिळवत आहेत. त्यांनी सरकारच्या दारात जाऊन आंदोलन करावे. अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. शेतकरी संपाला आमचा पाठींबा आहे, रविवारचा शिल्लक माल विक्री करण्याची जबाबदारी आमची होती. पण माणिक शिंदे अचानकपणे येऊन शेतीमालाची नासधूस करू लागले हे योग्य नाही. -जमीर बागवान, अध्यक्ष,महालक्ष्मी भाजीपाला असोसिएशन