शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

बाजार समितीचे ‘आदन’ लांबले!

By admin | Updated: September 10, 2014 23:49 IST

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी : ‘अशासकीय सदस्य’ म्हणून भारत पाटील यांची नेमणूक

राजाराम लोंढे -कोल्हापूर -कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या ‘अशासकीय मंडळा’ची लांबत चाललेली शेपूट थांबेना झाली आहे. गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या दोन सदस्यांची नियुक्ती झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पांडुरंग पाटील (म्हाकवे, ता. कागल) यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हा उपनिबंधकांना आले आहे. राजकीय सोयीसाठी सदस्यांची संख्या वाढू लागल्याने बाजार समितीचे ‘आदन’ लांबणार हे आता निश्चित झाले आहे. बाजार समितीच्या संचालकांच्या कारभारामुळे पणन संचालकांनी संचालक मंडळ बरखास्त करीत प्रशासकांची नियुक्ती केली. प्रशासकांनी सात-आठ महिन्यांत समितीच्या कारभाराला शिस्त लावत समितीचे उत्पन्नही वाढविले होते. आणखी सहा महिने प्रशासक काम करून कामाचा ‘पॅटर्न’ तयार करतील, असे वाटत असतानाच नेत्यांनी आपल्या सोयीसाठी ‘अशासकीय मंडळ’ आणले. बाजार समिती व जिल्हा बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर तोंडसुख घेणारे नेतेच या प्रक्रियेत पुढे होते. निवडणुकीतील सोय म्हणून आपापल्या कार्यकर्त्यांना संधी दिली. पहिल्यांदा पंधराजणांचे मंडळ अस्तित्वात आले. ही प्रक्रिया एकदम गुप्त झाल्याने ज्यांची निवड झाली, त्यांना धक्का बसलाच; पण इतर कार्यकर्त्यांची घालमेल वाढली. राष्ट्रवादीच्या कोट्यातून राधानगरी तालुक्याला वगळले म्हणून ‘एस. टी.’चे संचालक ए. वाय. पाटील यांनी राजेंद्र भटाले यांची वर्णी लावली. राष्ट्रवादीने एक वाढविला म्हणून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आणि त्यांनी तीन नावे पणनमंत्र्यांकडे पाठविली. तिसऱ्या नावावर एकमतच झाले नसल्याने अखेर दोघांना संधी दिली. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे बाजीराव पाटील (वडणगे) व वैभव सावर्डेकर (कोल्हापूर) यांची नेमणूक झाली. सध्या अठरा सदस्यांचे ‘जम्बो अशासकीय मंडळ’ आकारास आले. हे दोन सदस्य खुर्चीवर बसतात न बसतात तोच जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्याची वर्णी लावली. भारत पांडुरंग पाटील (म्हाकवे) यांच्या नियुक्तीचे पत्र जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांना आले आहे. आता अशासकीय मंडळाची संख्या १९ वर पोहोचली आहे. थेट नियुक्ती!आतापर्यंतच्या अठरा सदस्यांची नेमणूक करताना एक प्रक्रिया (कागदोपत्री) राबवली होती. दोन्ही काँग्रेसच्या मंत्र्यांच्या शिफारशीनंतर पणन मंडळाने ही नावे जिल्हा उपनिबंधकांकडे अभिप्रायासाठी पाठविली. त्यांच्या अभिप्रायानंतर नियुक्तीपत्रे देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले; पण पाटील यांच्याबाबतीत थेट पहिल्या आदेशाचा संदर्भ देत नियुक्ती केल्याचे समजते. सरबराई वाढलीप्रशासक होते त्यावेळी खर्चावर अंकुश होता; पण सदस्य आल्यापासून समितीच्या खर्चात वाढ झाली आहे. सदस्यांकडून मिटिंग भत्त्याची मागणी होत आहे. त्याच्या मान्यतेचा प्रस्ताव ‘पणन’कडे आहे. त्यामुळे आगामी काळात संचालक मंडळ बरखास्तीच्या उद्देशालाच हरताळ फासला जातो काय? अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.