शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटही थंडावले

By admin | Updated: November 17, 2016 01:08 IST

तूरडाळीचा तुटवडा : भाजीपाला, कांदा-बटाटा पडून

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ५०० व १००० च्या नोटा रद्दच्या निर्णयामुळे सलग सहाव्या दिवशी बुधवारी जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाला आहे. यामध्ये भाजीपाल्यांसह कांदा-बटाटा मार्केटही थंडावला आहे. तर धान्य बाजारात तूरडाळीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे हळूहळू मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. येथील राजर्षी शाहू मार्केट यार्डमधील भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून आलेल्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे. तर शेतकरीही ५00, १000 च्या नोटा स्वीकारत नसल्याने व्यापारी उधारीवर मालाची खरेदी व विक्री करीत आहेत. ज्याच्याकडे १00, २0 व ५0 रुपयांच्या पटीत नोटा आहेत. त्या व्यापाऱ्यांकडेच मालाचा उठाव होत आहे. तर अन्य व्यापाऱ्यांना कमी भावात व उधारीवर भाजीपाला विक्री करणे भाग पडत आहे. याशिवाय दिवसभरात मालाचा उठाव न झाल्याने काही माल शिल्लक राहत आहे. त्यामुळे या घाऊक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये भाज्यांचे भाव दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहेत. दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे : (कंसात कालचे दर) दोडका ११० रु. (१५०-२००), वांगी - १०० रु. (१६०-१७०), रताळी ६० रु. (१००), ढब्बू मिरची - १०० रु. (१८०), आले - १२० रु. (१८०), कोबी - २ रुपये प्रतिनग, कारली -११० रु. (१५०) असे दर घसरले आहेत. याचा परिणाम म्हणून बाजार ७० टक्के थंडावला आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे, मुंबईकडे जाणाराही माल याच ठिकाणी आल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी पंचाईत झाली. माथाडी कामगारांना अपेक्षित मेहनताना मिळेना झाल्याने तेही हवालदिल झाले आहेत.आवक नाही : मार्केट ठप्पनोोटा रद्दचा कांदा-बटाटा मार्केटवरही परिणाम झाला आहे. आग्रा, इंदोर येथून येणाऱ्या बटाट्याची नवी आवक कमी झाली आहे. तर मंंगळवेढा, हंगेवाडी, पंढरपूर येथून नव्या कांद्याचीही आवक कमी झाली आहे. यापूर्वीच्या मालाला दरही चांगला होता. तसेच किरकोळ व्यापाऱ्यांकडून उठावही होत होता. नोटा रद्दमुळे आग्रा, इंदोरहून येणारा नवा माल येईनासा झाला आहे. यात ट्रकधारकांना डिझेलपुरते तरी पैसे मिळतील की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे बाहेरून माल येईना झाला आहे. शिल्लक मालही तसाच पडून असल्याने मार्केट थंडावले आहे. किलोला १० ते २० रुपये इतका दर उतरला आहे. शेतकऱ्यांना देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. तत्काळ सुट्ट्या पैशांची सोय करावी. शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करताना व्यापारी काकुळतीला आला आहे. शेतकरी चेकने पेमेंट घेत नसल्याने पंचाईत होत आहे. मालाची आवक मोठी आहे; पण उठाव नसल्याने पैसे कसे भागवायचे, प्रश्न आहे.- बाबूराव लाड (कांदेकर), ंभाजीपाला घाऊक व्यापारी, मार्केट यार्डबाहेरून येणाऱ्या मालाच्या डिलिव्हरीसाठी व ट्रक चालकांना रोख स्वरूपात सुट्टे पैसे देण्यासाठी नसल्याने काही मालाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत तूरडाळीची लातूरहून कमी आवक झाली आहे. त्यामुळे तुरडाळीचा तुटवडा जाणवत आहे. तत्काळ सरकारने सुट्ट्या पैशांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यातून व्यवहार सुरळीत होतील. - सदानंद कोरगावकर, अध्यक्ष, कोल्हापूर व्यापारी व उद्योजक महासंघ.