शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मार्केटही थंडावले

By admin | Updated: November 17, 2016 01:08 IST

तूरडाळीचा तुटवडा : भाजीपाला, कांदा-बटाटा पडून

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या ५०० व १००० च्या नोटा रद्दच्या निर्णयामुळे सलग सहाव्या दिवशी बुधवारी जीवनावश्यक वस्तूंवर परिणाम झाला आहे. यामध्ये भाजीपाल्यांसह कांदा-बटाटा मार्केटही थंडावला आहे. तर धान्य बाजारात तूरडाळीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे हळूहळू मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे. येथील राजर्षी शाहू मार्केट यार्डमधील भाजीपाला मार्केटमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून आलेल्या मालाला भाव मिळेनासा झाला आहे. तर शेतकरीही ५00, १000 च्या नोटा स्वीकारत नसल्याने व्यापारी उधारीवर मालाची खरेदी व विक्री करीत आहेत. ज्याच्याकडे १00, २0 व ५0 रुपयांच्या पटीत नोटा आहेत. त्या व्यापाऱ्यांकडेच मालाचा उठाव होत आहे. तर अन्य व्यापाऱ्यांना कमी भावात व उधारीवर भाजीपाला विक्री करणे भाग पडत आहे. याशिवाय दिवसभरात मालाचा उठाव न झाल्याने काही माल शिल्लक राहत आहे. त्यामुळे या घाऊक बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. यामध्ये भाज्यांचे भाव दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहेत. दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे : (कंसात कालचे दर) दोडका ११० रु. (१५०-२००), वांगी - १०० रु. (१६०-१७०), रताळी ६० रु. (१००), ढब्बू मिरची - १०० रु. (१८०), आले - १२० रु. (१८०), कोबी - २ रुपये प्रतिनग, कारली -११० रु. (१५०) असे दर घसरले आहेत. याचा परिणाम म्हणून बाजार ७० टक्के थंडावला आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे, मुंबईकडे जाणाराही माल याच ठिकाणी आल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी पंचाईत झाली. माथाडी कामगारांना अपेक्षित मेहनताना मिळेना झाल्याने तेही हवालदिल झाले आहेत.आवक नाही : मार्केट ठप्पनोोटा रद्दचा कांदा-बटाटा मार्केटवरही परिणाम झाला आहे. आग्रा, इंदोर येथून येणाऱ्या बटाट्याची नवी आवक कमी झाली आहे. तर मंंगळवेढा, हंगेवाडी, पंढरपूर येथून नव्या कांद्याचीही आवक कमी झाली आहे. यापूर्वीच्या मालाला दरही चांगला होता. तसेच किरकोळ व्यापाऱ्यांकडून उठावही होत होता. नोटा रद्दमुळे आग्रा, इंदोरहून येणारा नवा माल येईनासा झाला आहे. यात ट्रकधारकांना डिझेलपुरते तरी पैसे मिळतील की नाही, अशी शंका आहे. त्यामुळे बाहेरून माल येईना झाला आहे. शिल्लक मालही तसाच पडून असल्याने मार्केट थंडावले आहे. किलोला १० ते २० रुपये इतका दर उतरला आहे. शेतकऱ्यांना देण्यासाठी सुट्टे पैसे नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. तत्काळ सुट्ट्या पैशांची सोय करावी. शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी करताना व्यापारी काकुळतीला आला आहे. शेतकरी चेकने पेमेंट घेत नसल्याने पंचाईत होत आहे. मालाची आवक मोठी आहे; पण उठाव नसल्याने पैसे कसे भागवायचे, प्रश्न आहे.- बाबूराव लाड (कांदेकर), ंभाजीपाला घाऊक व्यापारी, मार्केट यार्डबाहेरून येणाऱ्या मालाच्या डिलिव्हरीसाठी व ट्रक चालकांना रोख स्वरूपात सुट्टे पैसे देण्यासाठी नसल्याने काही मालाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत तूरडाळीची लातूरहून कमी आवक झाली आहे. त्यामुळे तुरडाळीचा तुटवडा जाणवत आहे. तत्काळ सरकारने सुट्ट्या पैशांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यातून व्यवहार सुरळीत होतील. - सदानंद कोरगावकर, अध्यक्ष, कोल्हापूर व्यापारी व उद्योजक महासंघ.